मालिका विजयासाठी भारताला १२७ धावांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2016 03:13 PM2016-06-13T15:13:38+5:302016-06-13T15:20:47+5:30

सलामी लढतीत शानदार विजय मिळवणाऱ्या धोनी ब्रिगेडच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा १२६ धावांत खुर्दा उडवला.

India need 127 runs to win series | मालिका विजयासाठी भारताला १२७ धावांचे आव्हान

मालिका विजयासाठी भारताला १२७ धावांचे आव्हान

Next
>ऑनलाइन लोकमत
हरारे, दि. १३ : सलामी लढतीत शानदार विजय मिळवणाऱ्या धोनी ब्रिगेडच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा १२६ धावांत खुर्दा उडवला. विजयासाठी भारताला ५० षटकात १२७ धावांची गरज आहे. भारताने हा विजय मिळवल्यास ३ सामन्याच्या मालिकेत आघाडी घेइल. 
सलामीच्या लढतीप्रमाणे या सामन्यातदेखील भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही.  
कामगिरीत सातत्य राखण्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा निर्धार आहे. युवा यजुवेंद्र चहलने आपल्या फिरकीच्या जोरावर ३ फलंदाज बाद केले तर सरण आणि कुलकर्णींने प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले. अक्षर पटेल आणि बुमरहाला ही प्रत्येकी एक विकेट मिळवण्यात यश आले.
झिम्बाब्वेकडून व्ही शिंबदा सोडता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. व्ही शिंबदा ने ५३ धावांची खेळी केली. चिगंबा आणि शिखदंर राजा यांना थोडाफार संघर्ष केला पण त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. चिगंबा २१ शिखदंर राजाने १० धावाची खेळी केली. भारतीय गेलंदाजीपुढे इतर फलंदाज अपयशी ठरले. 
 

Web Title: India need 127 runs to win series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.