T20 महिला वर्ल्ड कप - पावसामुळे खेळ थांबला

By admin | Published: March 19, 2016 06:40 PM2016-03-19T18:40:54+5:302016-03-19T18:40:54+5:30

फिरोजशहा कोटला मैदानावर सुरु असलेला भारत - पाकिस्तान सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे

T20 Women's World Cup - The game stopped due to the rain | T20 महिला वर्ल्ड कप - पावसामुळे खेळ थांबला

T20 महिला वर्ल्ड कप - पावसामुळे खेळ थांबला

Next
>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १९ - फिरोजशहा कोटला मैदानावर सुरु असलेला भारत - पाकिस्तान सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. एकीकडे कोलकात्यात पावसामुळे सामना रद्द होण्याची भीती असताना दिल्लीतदेखील आलेल्या अवकाळी पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. 
 
भारताने पाकिस्तानला 97 धावांचं लक्ष्य दिलं असून पाकिस्तानने 6 विकेट गमावत 77 धावा केल्या आहेत. पाकिस्तानला विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. 'डकवर्थ लुईस' नियमानुसार पाकिस्तान संघाकडे 2 धावांची आघाडी असल्याने सामना रद्द झाल्यास पाकिस्तानला विजेता घोषीत करण्यात येईल.पाकिस्तानने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने पहिली बॅटींग करत 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत 96 धावा केल्या आहेत. भारताकडून वेदा कृष्णमुर्तीने सर्वात जास्त 24 धावा केल्या आहेत. 
 

Web Title: T20 Women's World Cup - The game stopped due to the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.