अंडर१९ वर्ल्डकप, भारताचे श्रीलंकेला २६८ धावांचे आव्हान

By admin | Published: February 9, 2016 01:13 PM2016-02-09T13:13:32+5:302016-02-09T13:13:32+5:30

भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी २६८ धावांचे आव्हान दिले आहे.

Under-19 World Cup, Sri Lanka's 268 runs for India | अंडर१९ वर्ल्डकप, भारताचे श्रीलंकेला २६८ धावांचे आव्हान

अंडर१९ वर्ल्डकप, भारताचे श्रीलंकेला २६८ धावांचे आव्हान

Next

ऑनलाइन लोकमत 

मिरपूर, दि. ९ - भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी २६८ धावांचे आव्हान दिले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. १३ धावात श्रीलंकेचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. 
भारताकडून अनमोलप्रीत सिंगने सर्वाधिक (७२), एसएन खानने (५९) आणि वॉशिंगटन सुंदरने (४३) धावा केल्या. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला विजयासाठी २६८ धावांचे आव्हान दिले आहे. 

Web Title: Under-19 World Cup, Sri Lanka's 268 runs for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.