ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:15 AM2020-12-29T04:15:13+5:302020-12-29T04:15:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाथरी : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे पाथरी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. पॅनल प्रमुखांसह उमेदवार मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पाथरी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींपैकी ७ सदस्य संख्या असलेल्या आनंदनगर, पाटोदा, जैतापूरवाडी, निवळी, बाणेगाव, मंजरथ, पाथरगव्हाण या १३ ग्रामपंचायती आहेत. त्याचबरोबर ९ सदस्य संख्या असलेल्या बोरगव्हाण, कासापुरी, पोहे टाकळी, सिमूरगव्हाण, वाघाळा, गुंज, नाथ्रा, झरी, बांदरवाडा, तुरा, रामपुरी खु., बाबुलवार अशा २१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच ११ सदस्य असणाऱ्या हागदाव बु., रेणापूर, रेणाखळी, कानसूर, वरखेड, बाभळगाव आणि लिंबा या ग्रामपंचायती आहेत. तालुक्यात १३ सदस्य संख्या असणारी देवनांद्रा ही एकमेव ग्रामपंचायत असून, एकूण ४२ ग्रामपंचायतींमध्ये पॅनल प्रमुखांनी आपापले उमेदवार ठरवून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे पाथरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.