शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चिंताजनक! मेंदू, हृदयावरच नाही तर किडनीवरही होतोय उष्णतेचा वाईट परिणाम; 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 9:37 AM

1 / 7
भारतात खूप उष्णता वाढत आहे. या अतिउष्णतेमुळे हृदय, मेंदू आणि किडनीवर खूप वाईट परिणाम होत असल्याचं आता समोर आलं आहे. उष्णतेमुळे हीट स्ट्रोक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
2 / 7
अति उष्णतेमुळे लोक अनेकदा डिहायड्रेशनला बळी पडतात. अशा स्थितीत किडनी नीट काम करत नाही. या स्थितीत किडनीला योग्य प्रकारे आपलं काम करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
3 / 7
उष्णतेमुळे पचनाच्या समस्या देखील असू शकतात. यामुळे बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन देखील होतं. अति उष्णतेमुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी यांसारख्या समस्या निर्माण होतात.
4 / 7
उष्णतेमुळे अनेकदा छातीत जळजळ आणि आंबट ढेकर येण्याची समस्या उद्भवते. अन्नही नीट पचत नाही.
5 / 7
उष्णतेपासून वाचण्यासाठी दररोज नारळ पाणी प्या. कारण नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही.
6 / 7
उन्हाळ्यात काकडी जरूर खा. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. शरीरातील पाण्याची पातळी राखते. तसेच शरीराचे तापमान राखते. काकडी खाल्ल्याने वजन वाढत नाही.
7 / 7
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे चांगल्या बॅक्टेरियासाठी ओळखले जातात. त्यामुळे पोटही थंड राहते. याशिवाय दह्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeat Strokeउष्माघात