1 / 6नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर व सावनेर तालुक्यातील काही भागात वादळी पावसासह तुफान गारपीटसुद्धा झाल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात कोणतेही पीक नसले तरी संत्रा व मोसंबीच्या पिकांचे नुकसान झाले.2 / 6३ मे रोजी उपराजधानीतील तापमान ४५.३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. हा यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाचा उच्चांक होता. परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजे ४ मेपासून अचानक विदर्भातील वातावरणात बदल झाला आहे.3 / 6या अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. या वादळाच्या तडाख्यात रस्त्यावर अनेक झाडे कोसळली शिवाय काही झोपड्यासुद्धा उडाल्याची माहिती आहे4 / 6आकाशात काळ्या ढगांनी गर्दी करून जोराचे वादळ सुटले शिवाय काहीच वेळात धो धो पावसाला सुरुवात झाली.5 / 6 ४५.३ अंशापर्यंत वर चढलेला पारा ४०.४ अंशावर खाली आला असून नागपृरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.6 / 6 उपराजधानीत आज सायंकाळी जोरदार वादळासह अवकाळी पावसाने ‘एन्ट्री’ केली; शिवाय जिल्ह्यातील काही भागात तुफान गारपीटसुद्धा झाली.