केसगळतीचं सर्वांत मोठं कारण समोर; अंघोळीच्या पाण्यात 'हा' घटक असेल तर पडेल टक्कल, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 15:51 IST
1 / 9आजकाल प्रत्येक जण केस गळणे, पांढरे केस, केसात कोंडा यासह इतर समस्यांनी त्रस्त आहे. 2 / 9महिलांसोबतच पुरुष आणि लहान मुलांनाही केसगळतीचा सामना करावा लागत आहे. 3 / 9पाण्यातील वाढलेले खनिजांचे प्रमाण, विशेषतः सल्फेट आणि टीडीएस (एकूण विरघळलेले घन पदार्थ), केसगळतीचे प्रमुख कारण बनत आहे. 4 / 9बोअरवेल किंवा हार्ड वॉटरमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढल्याने अनेकांना आरोग्याचा त्रास होत आहे. 5 / 9पाण्याची गुणवत्ता केसांच्या आरोग्यावर थेट परिणाम करते. त्यामुळे योग्य पाण्याचा वापर करून केसगळती थांबवणे आवश्यक आहे. 6 / 9सल्फेट-फ्री उत्पादने वापरा, टाळूची स्वच्छता आणि पोषणाकडे लक्ष द्या, शुद्ध आणि मऊ पाणी वापरा, केस गळती वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. 7 / 9केसगळतीची कारणे कोणती? केसगळती ही अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की आहार, जीवनशैली, आनुवंशिकता, हार्मोनल बदल, ताणतणाव अशा कारणांमुळे केसगळती होते. 8 / 9पाण्याची गुणवत्ता देखील केसगळतीवर परिणाम करू शकते. तरुणपणातच केस गळत असल्याने अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.9 / 9टीडीएस किती हवा? केसांसाठी वापरण्यायोग्य पाण्यात टीडीएस २०० पीपीएमच्या आत असावा, ३०० पीपीएमपेक्षा जास्त टीडीएस असलेले पाणी त्वचेला कोरडे करू शकते आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवू शकते.