Ayushman Card: आयुष्यमान योजनेचे फायदे, पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत काय आहे? एका क्लिकवर जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 14:40 IST
1 / 7कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ प्रामुख्याने गरीब वर्ग आणि गरजू लोकांना देण्याची तरतूद आहे. आयुष्मान भारत योजनाही तशीच एक योजना आहे.2 / 7 या योजनेचा सर्वसामान्य लोकांना फायदा झाला आहे. ही योजना केंद्र सरकार चालवते आणि आता अनेक राज्य सरकारेही तिच्याशी संलग्न आहेत. ही आरोग्य योजना असून त्याद्वारे गरजू व गरीब वर्गाला लाभ देण्याचा प्रयत्न केला जातो. 3 / 7आयुष्मान भारत योजना असे या योजनेचे पूर्ण नाव आहे. ही योजना विशेषत: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी चालवली जात होती. केंद्र सरकार ही योजना राबवत आहे.4 / 7या योजनेसाठी पात्र असणाऱ्यांना आयुष्यमान कार्ड बनवले जाते, त्यानंतर कार्डधारक सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेऊ शकतात. त्याचा संपूर्ण खर्च सरकार उचलते.5 / 7योजनेसाठी हे आहेत पात्र- जे निराधार किंवा आदिवासी आहेत, जे लोक भूमिहीन आहेत,ज्या लोकांची घरे कच्ची आहेत. जे रोजंदारी मजूर आहेत ग्रामीण भागात राहणारे लोक. ज्यांच्या कुटुंबात दिव्यांग सदस्य इ.6 / 7असा करा अर्ज - आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी, अगोदर तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जावे लागेल. केंद्रात तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याला भेटून तुमची कागदपत्रे द्यावी लागतील ज्यांची पडताळणी केली जाते.7 / 7यानंतर तुमची पात्रता तपासली जाते . मग जेव्हा सर्वकाही बरोबर आढळले, तरच तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.