By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 11:08 IST
1 / 10राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्याचे संकेत दिले होते. 2 / 10त्यानुसार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात एसओपीही जारी करण्यात आली आहे. 3 / 10राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू झाले असून आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. सीएमओकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 4 / 10देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातून येत आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून वारंवार राज्यात कडक निर्बंध लादत, लॉकडाऊनचे संकेत दिले होते. 5 / 10याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानं मुख्यमंत्री ठाकरेंच्या विधानावर रोखठोक भूमिका घेतली होती. 6 / 10'लोक जर सांगूनही ऐकत नसतील तर लॉकडाऊन कराच. लोक केव्हा गांभीर्यानं मुद्दा समजून घेणार आहेत आणि कसा तेच कळत नाही', असा संताप हरभजननं व्यक्त केला होता. 7 / 10महाराष्ट्रात आता कडक निर्बंध लागू करण्यात आले असून नागरिकांनी नवीन नियमावली पाळावी, असे आवाहन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन केले आहे. 8 / 10आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरुन नवी निमयावलीही प्रसिद्ध केल असून ब्रेक द चेनची निमयावली पाळून सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केलंय. 9 / 10 आदित्य ठाकरेंचं हे ट्विट हरभजन सिंगने रिट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला फुल्ल सपोर्ट दर्शवला आहे.10 / 10हरभजनने आणखी एक ट्विट केलंय. त्यामध्ये, देशात दररोज 1 लाख रुग्ण आढळून येत आहेत. सर्वांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करुया, सर्वांनी सुरक्षित राहावे हीच विनंती, असे भज्जीनं म्हटलंय.