भारतातले सर्वात खतरनाक रेल्वे रूट, पण प्रवासात येतो सुंदर अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 23:11 IST
1 / 5चेन्नई-रामेश्वरम हा रेल्वे मार्ग हा भारतीय अभियंत्यांच्या कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना आहे. चहूबाजूंनी वेढलेल्या समुद्रातून जाणा-या या मार्गावरून प्रवास केल्यानंतर निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याची अनुभूती येते. 2 / 5मांडवी एक्स्प्रेसनं मुंबई ते गोवा असा प्रवास केल्यानंतर या मार्गात तुम्हाला निसर्गाचं सौंदर्य पाहायला मिळतं. डोंगरातून खळाळून वाहणारा धबधबा, सगळीकडे असलेली हिरवळीची तुम्ही मनमुराद आनंद लुटू शकता. 3 / 5कालका हे भारतातील सर्वात प्रसिद्ध रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे. टॉय ट्रेननं कालका ते शिमला प्रवासादरम्यान विहंगावलोकन केल्यावर निसर्गाचं मनोहारी दृश्य नजरेस पडतं. 4 / 5नवी दिल्लीहून आग्रा आणि पुन्हा नवी दिल्लीला येणारी महाराजा एक्स्प्रेस ही शाही ट्रेन समजली जाते. 2010मध्ये भारतीय रेल्वे प्रवासनानं या ट्रेनची सुरुवात केली. ट्रेनमध्ये पर्यटकांना सर्व सुखसुविधा दिल्या जातात.5 / 5टॉय ट्रेननं न्यू जलपाई गुडी ते दार्जिलिंगचा केलेला प्रवासही अविस्मरणीय ठरू शकतो. या ट्रेनमधून प्रवास करत असताना आजूबाजूला पसरलेले चहाचे मळे तुमचं लक्ष वेधून घेत असतात.