कबड्डी फायनलमध्ये भारत-इराणच्या खेळाडूंमध्ये राडा! रेफरीं झाले सैरभैर; जाणून घ्या नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 14:52 IST
1 / 6 भारताने पहिल्या हाफमध्ये १५-१० अशी आघाडी घेतली होती, परंतु इराणने दुसऱ्या हाफमध्ये चांगला खेळ केला. ११ गुण, दोन बोनस गुण व १ लोणचे गुण घेत त्यांनी सामना २८-२८ असा बरोबरीत आणला होता. 2 / 6कबड्डीच्या फायनलमध्ये ड्रामा पाहायला मिळाला. गतविजेता इराण आणि भारत यांच्यात कबड्डीची अंतिम लढतीत शेवटच्या १.०५ मिनिटाच्या खेळाच्याआधी २८-२८ अशी बरोबरी होती. पवनने चढाई केली आणि त्याला पकडण्यासाठी इराणचे बचावपटू सरसावले. त्यांनी पवना कोर्ट बाहेर फेकले, परंतु त्याचवेळी इराणचे ४ खेळाडूही बाहेर गेले. 3 / 6नियमानुसार भारताला ४ गुण मिळायला हवे होते, परंतु रेफरीने तसं केले नाही. अनेकदा रिप्ले पाहूनही रेफरींनी १-१ असा गुण दिला. नंतर रेफरींनी पुन्हा निर्णय बदलला आणि भारताच्या बाजूने ४-१ असे गुण दिले गेले. 4 / 6इराणच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आणि पुन्हा रेफरींनी १-१ असा गुण दिला. त्याचा निशेष म्हणून भारतीय खेळाडू कोर्टवर ठिय्या मांडून बसले. 5 / 6रेफरींमध्येच गोंधळ पाहायला मिळाला आणि त्यांनी जवळपास ३ वेळा हा निर्णय बदलला. अखेर भारताला ३ आणि इराणला १ गुण दिला गेला आणि सामन्यात भारताने ३१-२९ अशी आघाडी घेतली. 6 / 6भारताने ६५ सेकंदाच्या खेळात ३३-२९ अशी बाजी मारून सुवर्णपदक नावावर केले