1 / 9कफ झाला की एक वेळ खोकला परवडला पण कफ नको. असं म्हणायची वेळ येते. कारण सतत ठसका लागत राहतो. धास लागत राहते.2 / 9कफ जाता जात नाही. डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतले तरी परत येतो. त्याची काही कारणे आहेत. 3 / 9ती कारणे म्हणजे आपण खातो ते अन्न. काही पदार्थ कफ वाढवतात. असे पदार्थ पौष्टिकही असू शकतात. पण ज्यांना वारंवार कफाचा त्रास होतो, त्यांनी असे पदार्थ टाळणेच योग्य.4 / 9असे पाच पदार्थ आहेत ज्यांचे आपण सतत सेवन करतो. आणि त्यामुळे कफ वाढतो. जाणून घ्या कोणते पदार्थ आहेत. 5 / 9१. दही शरीरासाठी चांगले असले तरी ते थंड असते. ज्यांना वारंवार सर्दी, खोकला , कफ होतो अशा लोकांनी दही खाणे टाळा. 6 / 9२. अनेकांना तिखट पदार्थ खाण्याची आवड असते. पण तिखट पदार्थांमुळे घशाला त्रास होतो. त्यामुळे कफ, खोकला होतो. तिखट पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करा.7 / 9३. गार पेये प्यायला सगळ्यांनाच आवडतात. पण गार पेये घशासाठी चांगली नाहीत. त्यांच्यामुळे कफच नाही तर सर्दी, खोकलाही वाढतो. 8 / 9४. तळलेल्या पदार्थांमुळे हमखास कफ वाढतो. असे पदार्थ स्वास्थ्यासाठीही चांगले नाहीत. पदार्थ तळण्यापेक्षा कमी तेलात शॅलो फ्राय करा.9 / 9५. कोणत्याही प्रक्रियेतून गेलेले अन्न म्हणजेच पॅकेट फूड घशासाठी चांगले नाही. त्यात भरपूर रसायनयुक्त मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह असतात. असे पदार्थ खाणे टाळा.