ज्यांना भाजप उमेदवारीसाठी योग्य समजत नाही, त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं कारण नाही-शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 03:18 PM2023-10-22T15:18:37+5:302023-10-22T15:20:08+5:30

सध्या देशात बदल करण्याची भावना दिसत असून निवडणुकींचा कौल भाजपाच्या विरोधात असल्याचे चित्र आहे

A person who is not considered suitable for BJP candidature there is no reason for them to discuss Baramati - Sharad Pawar | ज्यांना भाजप उमेदवारीसाठी योग्य समजत नाही, त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं कारण नाही-शरद पवार

ज्यांना भाजप उमेदवारीसाठी योग्य समजत नाही, त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं कारण नाही-शरद पवार

बारामती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५१ टक्के मते घेऊन आम्ही बारामती जिंकणार असा विश्वास व्यक्त केला होता. त्यावरून शरद पवारांनी बावनकुळे यांना  टोला लगावला आहे. ज्या व्यक्तिला स्वत:चा पक्ष उमेदवारीसाठी योग्य समजत नाही. त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. असं पवार म्हणाले आहेत. पवार हे रविवारी बारामती (दि २२) दाैर्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी निवडणूकीवर भाष्य केले. 

पवार म्हणाले, बारामतीचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही. अखंड देशाला बारामतीचे महत्व माहिती आहे. म्हणूनच ते वारंवार बारामतीचे नाव घेतात.   त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. त्यांना भाजपनं तिकिट नाकारलं. त्यामुळे त्यांच्याबाबत काही बोलू नये, असे म्हणत पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना टोला लगावला. सध्या निवडणुका लागलेल्या पाच राज्यांमध्ये भाजपला लोक बाजूला करतील असे चित्र आहे. सध्या बदल करण्याची भावना देशामध्ये आहे. देशातील ७० टक्के राज्यांमध्ये भाजप नाही. अन् जिथे या निवडणुका आहेत. या निवडणुकींचा कौल भाजपाच्या विरोधात असल्याचे दिसते असे त्यांनी यावेळी सांगितले.

 जरांगे पाटील आणि सरकारमध्ये काही सुसंवाद झाल्याचे व सरकारने वेळ घेतल्याचे दिसते. याबाबत सरकार काय करते आहे याकडे आमचे लक्ष आहे. या दोन दिवसानंतर सरकारची भूमिका स्पष्ट होईल असं दिसत आहे. यातून मार्ग निघाला, प्रश्न सुटला तर मनापासून आनंद होईल,असे पवार म्हणाले.

कंत्राटी भरती बाबत बोलताना पवार म्हणाले, मी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नाही.जाण्याचे काय कारण नाही. महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री आहेत. एकाच मत तुम्ही सांगितलं. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी आज त्याच्यावर टिप्पणी केली आहे. त्यात हे स्पष्ट दिसते की ज्या वेळेला त्यासंबंधीचा निर्णय घेतला गेला. त्या निर्णयाच्या बैठकीला अनेक सहकारी हजर होते. ते आजही सरकारमध्ये आहेत. त्यावेळी त्यांची संमती होती. आज त्यासंबंधीचं भाष्य करत नाहीत. कंत्राटी कामगारांच्या संबंधीची अस्वस्थता कशाची होती. नोकरीमध्ये शाश्वती नाही. ठराविक काळासाठीच नोकरी आहे. दहा अकरा महिन्यांची नोकरी म्हटल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनात स्थैर्य नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जागा भरणे योग्य नाही. 

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. याविषयी बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, इंडिया आघाडीमध्ये जे जे लोक सहभागी होतील. त्याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. मात्र कालची बैठक ही त्यासाठी नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या 'प्रॉब्लेम ऑफ रुपीज' या ग्रंथाला शंभर वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरला कार्यक्रम होता या संदर्भासाठी आम्ही एकत्रित होतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: A person who is not considered suitable for BJP candidature there is no reason for them to discuss Baramati - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.