'जे टीका करतात ते आपल्या कर्माने संपतात', सामतांचा नाव न घेता राणेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 11:43 AM2022-02-18T11:43:13+5:302022-02-18T11:49:33+5:30

उदय सामंतांचा नारायण राणेंना टोला

those who criticize end with their deeds said uday samant narayan rane | 'जे टीका करतात ते आपल्या कर्माने संपतात', सामतांचा नाव न घेता राणेंना टोला

'जे टीका करतात ते आपल्या कर्माने संपतात', सामतांचा नाव न घेता राणेंना टोला

googlenewsNext

पिंपरी : मी टीका करणारा मंत्री नाही. कुणावर टीकाही करीत नाही. टीका करणाऱ्यांना उत्तरही  देत नाही. जे टीका करतात ते आपल्या कर्माने संपतात, अशी टीका राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांचे नाव न घेता केली.

चिंचवड येथे आयोजित शब्द संस्थेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते. नारायण राणे यांचे नाव न घेता सामंत यांनी टीका केली.

सामंत म्हणाले, ‘‘काही लोक नुसतेच टीका करत फिरतात. देशात वातावरण निर्मिती करतात. सगळीकडे फिरतात ते कोकणात निवडणुकीत पडतात.  मी काही चुकत असेल तर माझ्या विधानसभेत उभे राहून निवडून येवून दाखवा.’’

Web Title: those who criticize end with their deeds said uday samant narayan rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.