रत्नागिरी : किरकोळ वादातून मित्राने केला मित्राचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 01:32 PM2023-01-04T13:32:53+5:302023-01-04T13:34:36+5:30

२ जानेवारी रोजी सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास करंजाळी रस्त्यावर एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला होता.

Ratnagiri A friend killed a friend over a minor dispute | रत्नागिरी : किरकोळ वादातून मित्राने केला मित्राचा खून

रत्नागिरी : किरकोळ वादातून मित्राने केला मित्राचा खून

googlenewsNext

शिवाजी गोरे

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पावनळ करंजाळी रस्त्यावरती आढळलेल्या मृतदेह हा खूनाचा प्रकार असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात पुढे आला आहे. याप्रकरणी जयकिसन ओमप्रकाश सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. सुशांत किशोर परब असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा किरकोळ वादातून खून झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. 

सुशांतचा मुंबई येथील मित्र संशयित जयकिसन ओमप्रकाश सिंह याला काही तासांत दापोली पोलिसांनी खेड येथून एका लॉजमधून ताब्यात घेतले आहे. मात्र, हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे समजू शकलेले नाही. २ जानेवारी रोजी सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास करंजाळी रस्त्यावर एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला होता. त्याची खबर दापोली पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटली. करंजाळी येथे आपल्या आजीकडे राहणाऱ्या सुशांत किशोर परब याचाच हा मृतदेह
असल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Ratnagiri A friend killed a friend over a minor dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.