जिल्ह्यातील ३९ लाख टन उसाचे गाळप; ४१.६७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

By अशोक डोंबाळे | Published: December 31, 2022 07:19 PM2022-12-31T19:19:23+5:302022-12-31T19:20:00+5:30

पाच कारखान्यांचे गळीत हंगाम बंदच

39 lakh tonnes of sugarcane bagasse in the sangli district; 41.67 lakh quintal sugar production | जिल्ह्यातील ३९ लाख टन उसाचे गाळप; ४१.६७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

जिल्ह्यातील ३९ लाख टन उसाचे गाळप; ४१.६७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

Next

सांगली : जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी १३ साखर कारखान्यांचे गळीत हंगाम जोमात सुरू आहेत. पाच कारखान्यांच्या व्यवस्थापनाने अनेक प्रयत्न करूनही त्यांना या वर्षाचेही गळीत हंगाम चालू करता आले नाहीतच. १३ कारखान्याने आतापर्यंत ३८ लाख ९४ हजार ५३० टन उसाचे गाळप करून ४१ लाख ६७ हजार ५०४ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

आटपाडी तालुक्यातील माणगंगा, कवठेमहांकाळचा महांकाली, भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे तासगाव आणि नागेवाडी, पृथ्वीराज देशमुख यांचा केन ॲग्रो हे पाच कारखाने या वर्षीही गळीत हंगाम चालू करू शकले नाहीत. उर्वरित १३ साखर कारखान्यांचे मात्र जोमात गळीत हंगाम सुरू झाले आहेत. ५० टक्केपर्यंत उसाचे गाळप करण्यात कारखाने यशस्वी झाले आहेत. पण, अनेक कारखाने सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातून ऊस गाळपास आणत आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस शेतातच राहिला आहे. काही शेतकऱ्यांच्या उसाला तर १३ ते १४ महिने होऊनही गाळपास गेला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. याकडेही साखर कारखानदारांनी लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांकडील उसाचे गाळप

कारखाना                         ऊस गाळप (टन) साखर क्विंटल उतारा

राजारामबापू (साखराळे) ३७६१४५             ३९५५०० १०.६३
राजारामबापू (वाटेगाव) २३९९८०             २८३५०० ११.९०

राजारामबापू (कारंदवाडी) १७९१०५             २१५३५० १२.०९
राजारामबापू (जत)            १६८९९५             १७८१७० १०.५५

हुतात्मा (वाळवा)             २१७६१०             २०७०७५ १०.८५
मोहनराव शिंदे (म्हैसाळ) २२६५००             २४३४०० १०.८८

क्रांती (कुंडल)             ४०५१३०             ४२८९०० १०.७५
सोनहिरा (वांगी)             ३९३५२०             ४४९६०० ११.५७

वसंतदादा (दत्त इंडिया) ५२९८३८             ५४९५३० १०.३८
उदगिरी शुगर (बामणी) २७०५५०             २९२८५० १०.९५

विश्वास (चिखली)            २९८५५०             ३४३०५० ११.६१
श्री श्री शुगर (राजेवाडी) ३५१५२७             ३०७८२९ ८.८८

दालमिया (करंगुली) २३८०८०             २७४७५० ११.५४

चौदा महिने होऊनही उसाला तोड नाही

शेतकऱ्यांनी उसाची लागवण करून १३ ते १४ महिने होऊनही साखर कारखान्यांकडून वेळेत तोडी मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अनेक ठिकाणी उसाला तुरे आले असून वजनही घटणार असल्यामुळे शेतकरी ऊस तोडी मिळविण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडे फेऱ्या मारत आहेत.

गाळपात दत्त इंडिया, उताऱ्यात राजारामबापूची आघाडी

सांगलीतील वसंतदादा-दत्त इंडिया कारखान्याने आतापर्यंत ५ लाख २९ हजार ८३८ टन उसाचे गाळप करून ५ लाख ४९ हजार ५३० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १०.३८ टक्केच आहे. राजारामबापू कारखान्याच्या कारंदवाडी युनिटने १ लाख ७९ हजार १०५ टन उसाचे गाळप करून २ लाख १५ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १२.०९ टक्के घेऊन आघाडी घेतली आहे.

Web Title: 39 lakh tonnes of sugarcane bagasse in the sangli district; 41.67 lakh quintal sugar production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली