दिल्ली हिंसाचार करणाऱ्यांना बेड्या ठोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:19 AM2021-02-05T07:19:18+5:302021-02-05T07:19:18+5:30
इस्लामपूर : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घेऊ नयेत आणि दिल्लीत शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आ. ...
इस्लामपूर : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घेऊ नयेत आणि दिल्लीत शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आ. सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दिल्लीच्या हिंसाचारप्रकरणी विरोध करणाऱ्यांना बेड्या ठोकून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत कोणत्याही परिस्थितीत कृषी कायदे मागे घेऊ नये, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.
दिल्लीत कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा रयत क्रांती संघटना आणि भाजपकडून निषेध नोंदविण्यात आला. खोत आणि पडळकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चात महिला आणि रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चाद्वारे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.
दिल्लीतील हिंसाचार करणारे दहशत माजवत आहेत तसेच अराजकता निर्माण करणाऱ्या या आंदोलकांना बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडीक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, विक्रम पाटील उपस्थित होते.
फोटो-२७इस्लामपूर१
फोटो ओळ :
इस्लामपूर येथील प्रांत कार्यालयावर भाजप आणि रयत क्रांती संघटनेने मोर्चा काढला. यावेळी आ. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, राहुल महाडीक, भगवानराव साळुंखे, विक्रम पाटील उपस्थित होते.