भानगड केली नाही, तर ईडीची भीती कशाला? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 02:36 PM2023-05-15T14:36:39+5:302023-05-15T14:37:23+5:30

महाविकास आघाडी मोडायचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून चालू असून, राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच शासन येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.

If not done mistake then why the fear of ED State President of NCP Jayant Patil's statement | भानगड केली नाही, तर ईडीची भीती कशाला? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वक्तव्य

भानगड केली नाही, तर ईडीची भीती कशाला? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वक्तव्य

googlenewsNext

नेर्ले (जि. सांगली) : आजपर्यंत सनदशीर मार्गाने जगलो, त्यामुळे सचोटीने काम केले. कोणतीही भानगड केली नाही. त्यामुळे ईडीच्या आलेल्या नोटिसीला घाबरण्याचे काहीच कारण नाही. महाविकास आघाडी मोडायचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून चालू असून, राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच शासन येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.

आमदार पाटील म्हणाले की, वाळवा तालुका क्रांतिकारकांचा असून, आपणाला संघर्षाचा इतिहास आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड उद्रेक असून, आपण सार्वत्रिक निवडणुकीची वाट बघूया. सोसायट्यांनी आजपर्यंत लोकांना ताकद देण्याचे काम केले. शंभरीकडे वाटचाल करत असलेल्या या संस्थेने चौफेर प्रगती केली आहे.  उत्पन्नाची साधने वाढविणे गरजेचे आहे.
 

Web Title: If not done mistake then why the fear of ED State President of NCP Jayant Patil's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.