तर लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडू: साताऱ्यातील बैठकीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:11 PM2018-07-24T23:11:41+5:302018-07-24T23:11:44+5:30

In the meeting of Satara, the determination will be broken | तर लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडू: साताऱ्यातील बैठकीत निर्धार

तर लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडू: साताऱ्यातील बैठकीत निर्धार

Next


सातारा : आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवण्याची मागणी संतप्त युवक आणि माताभगिनींनी केल्यानंतर त्याला बैठकीत एकमुखी पाठिंबा देण्यात आला. बंदमध्ये अनुपस्थित राहणाºया लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याची मोहीमही आम्ही हाती घेणार असल्याचा इशारा संतप्त मराठा युवकांनी बैठकीत दिला.
मराठा आरक्षणासाठी लढाई आता ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’च्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी सातारा येथे मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वय समितीची बैठक साताºयात झाली. त्यामध्ये सातारा जिल्हा बंद ठेवण्याचा निर्णय तर घेण्यात आलाच त्याचबरोबर आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन कायम राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले.
जिल्हाभरातून मराठा बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. महामोर्चा आणि ठिय्या आंदोलना खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरेसवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. मराठा आरक्षणाची लढाई आता थांबवायचीच नाही. काही झालेतरी ही लढाई आपल्याला यशस्वी करून दाखावयची आहे, असा निर्धार सातारा जिल्ह्यातील तरुणाईने केला आहे. बैठकीत असंख्य युवक आक्रमकपणे बोलत होते. सरकारने कशी फसवणूक केली, याचा प्रत्येकजण पाढा वाचत होता. ‘शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. मुंबई मोर्चावेळी देण्यात आलेल्या एकाही घोषणेची पूर्तता झालेली नाही. कोणत्याच सवलती मराठा समाजाला मिळत नाहीत. पन्नास टक्के शुल्क भरूनही प्रवेश मिळत नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज मिळत नाही. त्यातच मेगा भरतीचा घाट घातला असून, त्यातूनही आपल्याला काहीच मिळणार नाही. मराठा आरक्षणासाठी आपली लढाई सुरू असताना सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मराठा समाजाची फसवणूक करण्याचे काम मुख्यमंत्र्यांकडून होत आहे. त्यामुळे आता आपल्याला करो या मरोची भूमिका घ्यावी लागणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. ठिय्या आंदोलनात दररोज एक तालुका सहभागी होणार आहे.
शाळा, महाविद्यालयेही राहणार बंद
बुधवारी होणारा सातारा जिल्हा बंद कडकडीत होणार आहे. सातारा जिल्हा बंदची हाक महामोर्चावेळीच दिली जाणार आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक, शाळा, महाविद्यालये, एसटी जीप, रिक्षा बंद राहणार आहेत. शाळा महाविद्यालयांसह सर्व संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक समितीच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, सातारा जिल्हा पोलीस दल व समन्वय समिती यांच्यात चर्चा होऊन सातारा जिल्ह्याची शांतता अबाधित ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
शांततेत बंद पाळण्याचे पोलिसांचे आवाहन
साताºयातील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेत बंद पाळून मोर्चा काढावा. हिंसक कृत्य करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्यासाठी १ पोलीस उपअधीक्षक, ३ पोलीस निरीक्षक, १७ उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक, १५० कर्मचारी, ३ सीआरपीची पथके व ५० होमगार्ड यांची नियुक्ती केली आहे.

Web Title: In the meeting of Satara, the determination will be broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.