लाखो वारकऱ्यांना दिलासा; आषाढी वारीतील सहभागी वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण

By Appasaheb.patil | Published: June 21, 2023 02:28 PM2023-06-21T14:28:16+5:302023-06-21T14:29:56+5:30

याची माहिती पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने लोकमतशी बोलताना दिली.

relief to millions of warkari now insurance cover for the participating varkari in ashadhi wari by the government | लाखो वारकऱ्यांना दिलासा; आषाढी वारीतील सहभागी वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण

लाखो वारकऱ्यांना दिलासा; आषाढी वारीतील सहभागी वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असून लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार असल्याची माहिती पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने लोकमत शी बोलताना दिली.

वारी कालावधीत एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. 

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतल्याचे मंदिर समितीने सांगितले.

Web Title: relief to millions of warkari now insurance cover for the participating varkari in ashadhi wari by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.