ठाणे शहरात सहा तासात ८७.३८ मिमी पाऊस; भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग

By अजित मांडके | Published: September 16, 2022 03:20 PM2022-09-16T15:20:08+5:302022-09-16T15:20:44+5:30

भातासा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. तरी प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना केलेल्या आहेत.

87.38 mm rain in Thane city in six hours; Release of water from Bhatsa Dam | ठाणे शहरात सहा तासात ८७.३८ मिमी पाऊस; भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग

ठाणे शहरात सहा तासात ८७.३८ मिमी पाऊस; भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग

googlenewsNext

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारीही ठाणे शहरात कहर सुरू ठेवला. सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच या सहा तासात ८७.३८ मिमी पावसाची नोंद झाली असून यामध्ये कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झालेली नाही. तर ठाणे शहरातील सखल भागांसह अन्य पाच ठिकाणी पाणी साचले, एक ठिकाणी टोरंटच्या केबलवरती झाड कोसळले तर दोन घटनांमध्ये झाडांच्या फांदया दोन दुकानांसह एक चारचाकी गाडीवर कोसळल्या आहेत. याचदरम्यान भातासा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. तरी प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना केलेल्या आहेत.

गेल्या चोवीस तासात ठाणे शहरात ५९.६६ मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी रात्री सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दिवसभर सुरूच होता. याचदरम्यान सकाळी ८.३० ते दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास म्हणजे सहा तासात ८७.३८ मिमी पाऊस झाला. यामध्ये साडेबारा ते दीड या एक तासात २२.८६, तसेच दीड ते अडीच या तासभरात २१.०९ मिमी पावसाची नोंद झाली तर सकाळी साडे आठ ते साडेअकरा दरम्यान ४१.१४ मिमी पाऊस झाला. मात्र साडेअकरा ते साडेबारा या एक तासात अवघा २.२८ मिमी पाऊस झाला आहे. 

सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शहरातील सखल भागांसह टेकडी बंगला, भास्कर कॉलनी, उथळसर गवळी वाडा,चितळसर पोलीस ठाण्याच्या आवारात,मुंब्रा ठाकुर पाडा आणि जुना आरटीओ ऑफिस परिसरात पाणी साचले होते. या घटना सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यानच्या आहेत. तर सावरकर नगर येथे झाडाची फांदी दोन दुकानावर तसेच वसंत विहार येथे झाडाची फांदी चारचाकी गाडी पडली होती. याशिवाय दिवा बेतवडे गाव येथे टोरंटच्या केबलवरती झाड कोसळले असून ते झाड कापून बाजूला करण्यात आले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग
गुरुवारीपासून भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार चालू आहे. भातासा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी १.२५ मीटर गेट उघडून पाणी सोडण्यात येत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासोबतच, सापगाव पूल बुडणार नाही अश्या पद्धतीने पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, अजून पावसाचा जोर वाभढल्यास धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवावा लागेल. तरी सापगाव पुलावरून पाणी जाण्याची परिस्थिती येण्याची शक्यता पाहून, प्रशासनाच्या वतीने सतर्कतेच्या सूचना  देण्यात आली आहे.

Web Title: 87.38 mm rain in Thane city in six hours; Release of water from Bhatsa Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.