इगतपुरीतील आदिवासी शेतकऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा; न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2023 07:31 PM2023-12-05T19:31:49+5:302023-12-05T19:32:21+5:30

सलग पायी निघालेला मोर्चा कसारा घाटा च्या पुढे आला असून पायी निघालेला शेतकऱ्यांचा हा लॉन्ग मार्च थेट मुबंईत जाणार

Adivasi farmers of Igatpuri march on Ministry mumbai; Warning of self-immolation if justice is not served | इगतपुरीतील आदिवासी शेतकऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा; न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा

इगतपुरीतील आदिवासी शेतकऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा; न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा

- शाम धुमाळ

कसारा :इगतपुरी तालुक्यातील भावली ,चिंचले,आवळखेड सह काही आदिवासी गावातील शेतजमिनी काही दलालांनी विक्री करून आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमीन बेकायदेशीर बळकावल्या  गेल्या 2011 पासून इगतपुरी तालुक्यातील पीडित आदिवासी शेतकरी बांधव  भूमाफियांवर व दलाला वर कारवाई व्हावी यासाठी शासन दरबारीं भांडत आहेत परंतु त्या पीडित शेतकर्यांना न्याय मिळत नसल्याने आज इगतपुरी तालुक्यातील शेकडो आदिवासी शेतकरी आपल्याला न्याय मिळावा फसवणूक करून धंन धांडगे व दलालांनी लाटलेल्या जमिनी परत मिळाव्यात व फसवणूक करणाऱ्या समज कंटकां वर कारवाई व्हावी यासाठी. आज या आदिवासी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा मुंबई च्या दिशेने निघाला असून हा मोर्चा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात पोहोचले आहे.

बेकायदेशीर बळकावलेल्या आदिवासींच्या शेत जमीन परत द्या व भूमाफियांवर गुन्हे दाखल करा जी घरे दादागिरी करून तोडली त्यांची भरपाई द्यावी यासह विविध मागणीसाठी हा आदिवासी शेतकऱ्यांचा  मोर्चा पायी मुंबई च्या दिशेने निघाले आहे .या मोर्चात शेकडो आदिवासी शेतकरी सहभागी झाले असून महिला व वृद्धांचा सहभाग जास्त प्रमाणात आहे.

 सलग पायी निघालेला मोर्चा कसारा घाटा च्या पुढे आला असून पायी निघालेला शेतकऱ्यांचा हा लॉन्ग मार्च थेट मुबंईत जाणार असून शासन स्तरावर कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने शासनाचा निषेध नोंदवत हा मोर्चा कसारा च्या पुढे निघाला आहे.
मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा स्थिरवणार असून मंत्र्यांना निवेदन देऊन आझाद मैदानात काही शेतकरी उपोषण करणार आहेत तर काही शेतकरी आत्मदहन करणार असल्याचे मोर्चे करां नी स्पष्ठ केले.

2011 पासून आम्ही इगतपुरी तहसीलदार,जिल्हाधिकारी नाशिक यांच्या कडे न्याय मागत आहोत आमच्या कडील सर्व दस्तावेज आम्ही प्रशासनास दिले,आमचे जबाब नोंदवले तरी देखील प्रशासनाने अध्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही उलट ज्यांनी आमच्या जागा लाटल्या त्यांनी आम्हाला गुंडाकरवी मारहान केली म्हणून आम्ही सर्व आदिवासी  मंत्रालया वर मोर्चा घेऊन निघालो असून आम्ही आत्मदाहन करणार आहोत.
- बेबीताई हिलम, पीडित शेतकरी

Web Title: Adivasi farmers of Igatpuri march on Ministry mumbai; Warning of self-immolation if justice is not served

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.