गाठीशी असलेले सगळे पैसे संपलेत...तुम्हीच सांगा पोटाची खळगी कशी भरायची?

By जितेंद्र कालेकर | Published: May 5, 2020 01:44 AM2020-05-05T01:44:21+5:302020-05-05T01:51:17+5:30

जवळचे सर्व पैसे संपले. त्यामुळे पोटाची खळगी कशी भरायची? तुम्हीच सांगा? असा सवाल वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर रविवारी अर्ज देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या श्रावणकुमार चमार याच्यासह अनेकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. पोलीस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून योग्य माहिती दिली जावी. तसेच यासाठी एक खिडकी योजनाही अमलात आणावी, अशी मागणीही या मजूरांनी केली आहे.

All the money with the knot is gone ... you tell me how to fill the stomach? | गाठीशी असलेले सगळे पैसे संपलेत...तुम्हीच सांगा पोटाची खळगी कशी भरायची?

शासकीय यंत्रणेतील समन्वयाअभावी ठाण्यात परप्रांतीय मजूरांचे हाल

Next
ठळक मुद्देशासकीय यंत्रणेतील समन्वयाअभावी ठाण्यात परप्रांतीय मजूरांचे हालअनेकांच्या पोलीस ठाण्याबाहेर रांगा

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गाठीशी असलेले दहा हजार रुपये गेल्या ४० दिवसांमध्ये संपले. आता रोजचा दिवस कसा काढायचा. पोटाची खळगी कशी भरायची? तुम्हीच सांगा? असा सवाल वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर रविवारी अर्ज देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या श्रावणकुमार चमार याच्यासह अनेकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. पोलीस आणि महापालिका यांच्यातील योग्य समन्वयाअभावी तसेच योग्य माहिती न मिळाल्यामुळे अशा अनेक मजूरांचे हाल होत आहेत.
माजीवडा भागात राहणारा श्रावणकुमार (३०) हा मुळचा उत्तरप्रदेशातील गोरखपूरचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो स्टाईल बसविण्याचे नेताराम या ठेकेदाराकडे काम करतो. गावी आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. गाठीला जे दहा हजार रुपये होते. तेही आतापर्यंतच्या जेवणासाठी संपले. कोणी तरी अन्नदान करतो. पण त्यांच्या देण्याचा आणि देण्याच्या वेळेचा कोणताही भरवसा नाही. मग पोटातील भूकेची आग कशी विझवणार? असा रोजचा प्रश्न आहे. त्यासाठीच गावी जायचे आहे. पण त्यासाठीही डॉक्टरांना २५० ते ३०० रुपये मोजावे लागतायेत. पोलीस ठाणे, डॉक्टर आणि पुन्हा नगरसेवक यांच्याकडे फेऱ्या माराव्या लागताहेत. योग्य माहितीही कुठे मिळत नाही. जीव अगदी मुठीत आला आहे. हरीश चव्हाण (२२, रा. माजीवडा, ठाणे) हाही असाच एक स्टाईल कारागिर आहे. त्याचीही अशीच अवस्था असल्याचे त्याने सांगितले. सॅनिटायझरने हात धुणे सोडा, रोजच्या जगण्यासाठीच पैसे नाहीत. प्रत्येक गोष्टीची समस्या आहे. मग इथे राहण्यापेक्षा गोरखपूर (उत्तरप्रदेश) या आपल्या गावी जाणार आहे. पण पोलीस ठाण्यात अर्ज देण्याची, पुन्हा डॉक्टरकडे जाण्याची रांग मोठी असल्याने गेली दोन दिवस फेºया मारतोय. आता करायचे काय? पाणी पिऊन भूक भागवतोय, असेही त्याने सांगितले. गावी जाण्यासाठीचा जो अर्ज एका दुकानात दिला जातोय त्याची किंमतही ३० रुपये तर अन्य एका टोकनसाठी २० रुपये सोसावे लागतायेत. अशा वेळी तरी अशी लूटमार व्हायला नको, अशीही अपेक्षा त्याने व्यक्त केली. तर अन्य एका झारखंडच्या मजूरानेही अशीच तक्रार केली.
* दरम्यान, पोलीस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून योग्य माहिती दिली जावी. तसेच यासाठी एक खिडकी योजनाही अमलात आणावी, अशी मागणीही या मजूरांनी केली आहे.
* यासंदर्भात वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले की, बाहेरगावी जाणा-याने तो कंटेनमेंट झोन मधील रहिवाशी नसल्याचे नगरसेवक किंवा प्रभाग अधिका-याचे प्रमाणपत्र आणावे. तसेच वैद्यकीय तपासणीचे नोंदणीकृत डॉक्टरकडून प्रमाणपत्र आणणे गरजेचे आहे. शिवाय, तो कोणत्या गाडीने कधी आणि किती जणांसोबत जाणार याचाही तपशील त्याने अर्जात उल्लेख करावा. सध्या तरी रेल्वेची सुविधा नाही. त्याने खासगी वाहन करणे अपेक्षित आहे. अर्जासाठी त्यांच्याकडून अतिरिक्त कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचा दावाही त्यांनी केला. परिपूर्ण भरलेला एकही अर्ज अद्याप प्राप्त झाला नसल्याचेही ते म्हणाले.

Web Title: All the money with the knot is gone ... you tell me how to fill the stomach?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.