गणेशोत्सवात प्लास्टीकचा आणि थर्माकॉलचा वापर बंद; गणेशोत्सव काळात आतापर्यंत ५४ टन निर्माल्य संकलित

By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 10, 2022 04:13 PM2022-09-10T16:13:28+5:302022-09-10T16:13:57+5:30

समर्थ भारत व्‍यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्‍या संयुक्‍त विदयमाने गणेशोत्‍सव काळातील निर्माल्‍याचे संकलन करणे व त्‍याची शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लावणे या अभियानाने यंदा १२ व्‍या वर्षात पदार्पण केले.

Ban on use of plastic and thermocol during Ganeshotsav; So far 54 tons of nirmalya collected during Ganeshotsav | गणेशोत्सवात प्लास्टीकचा आणि थर्माकॉलचा वापर बंद; गणेशोत्सव काळात आतापर्यंत ५४ टन निर्माल्य संकलित

गणेशोत्सवात प्लास्टीकचा आणि थर्माकॉलचा वापर बंद; गणेशोत्सव काळात आतापर्यंत ५४ टन निर्माल्य संकलित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दहा दिवसांच्या गणेशोत्सव काळात यावर्षी ५४ टन निर्माल्य संकलित झाले. पैकी ४७ टन निर्माल्य शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येणाऱ्या प्रक्रियेसाठी देण्यात आले. या दहा दिवसांच्या गणेशोत्सवात १० टक्के अविघटनशील घटक आढळून आले तर सजावटीमध्ये जवळपास प्लास्टीकचा वापर नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. यंदा फुले महाग असल्याने फुलांचा वापर कमी करण्यात आल्याने निर्माल्य देखील घटल्याची माहिती समर्थ भारत व्यासपीठाने दिली.

समर्थ भारत व्‍यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्‍या संयुक्‍त विदयमाने गणेशोत्‍सव काळातील निर्माल्‍याचे संकलन करणे व त्‍याची शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लावणे या अभियानाने यंदा १२ व्‍या वर्षात पदार्पण केले. यंदा दिड दिवसाच्‍या गणपती विसर्जनात जवळपास १० टन तर पाचव्या दिवसांच्या गणपती विसर्जनात १२ टन तर गौरी गणपती विसर्जनावेळी १५ टन निर्माल्‍य तसेच, दहा दिवसांच्या गणेशोत्सवात १७ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. यंदा घरगुती गणेशोत्सवाबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही निर्माल्य संकलनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समर्थ भारत व्यासपीठाने सांगितले. शहरातील जवळपास ७ विसर्जन घाटावर दरवर्षी सफाई सेवक व कार्यकर्त्‍यांच्‍या माध्‍यमातून गणेश भक्‍तांकडून निर्माल्‍य व सजावटीचे साहित्‍य संकलित केले जात होते. विसर्जन घाटावर तैनात करण्‍यात आलेल्‍या वाहनांमध्‍ये या निर्माल्‍याचे जैविक व अजैविक असे वर्गीकरण केले जाते.

वर्गिकृत कचरा समर्थ भारत व्‍यासपीठाच्‍या संयुक्‍त कचरा व्‍यवस्‍थापनावर पाठवला जातो. जैविक कचऱ्यातून खत निर्मिती केली जाते तर अजैविक कच-यात असलेल्‍या प्‍लास्‍टीक, कागद, पुठठा, काच, कागद सारखे घटक देखील संस्‍थेच्‍या प्रकल्‍प पुर्ननिर्माणमध्‍ये शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाटीसाठी पाठवले जातात. दिड दिवस, पाच दिवस, सहा आणि दहा दिवसांच्याच्‍या विसर्जनात जवळपास ५४ टन निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले आहे. कोविड नंतर यंदाचा गणेशोत्‍सव मोठया उत्‍साहात साजरा होत. शुक्रवारी दहा दिवसांच्या गणेशाचे विसर्जन झाले त्यात १७ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. संपूर्ण दहा दिवसांच्या गणेशोत्सवापर्यंत १० टक्के अविघटनशील घटक आढळून आले.

Web Title: Ban on use of plastic and thermocol during Ganeshotsav; So far 54 tons of nirmalya collected during Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.