बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:04 AM2018-06-01T01:04:41+5:302018-06-01T01:04:41+5:30

बारावीचा निकाल लागल्यावर तीन विषयांत नापास झालेल्या एका विद्यार्थिनीने बदलापूर रेल्वेस्थानकाजवळ धावत्या लोकलखाली येऊन आत्महत्या केली.

Hrithik's suicide | बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Next

बदलापूर : बारावीचा निकाल लागल्यावर तीन विषयांत नापास झालेल्या एका विद्यार्थिनीने बदलापूर रेल्वेस्थानकाजवळ धावत्या लोकलखाली येऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.
बदलापूरच्या रमेशवाडी भागात राहणारी शुभांगी लांघी ही विद्यार्थिनी उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयात वाणिज्य शाळेत शिकत होती. बुधवारी बारावीचा निकाल लागल्यावर ती विद्यार्थिनी तीन विषयांत नापास झाली होती. या नैराश्येपोटी तिने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. सायंकाळी ५ च्या सुमारास तिने ही आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीत ‘बाबा मला माफ करा. मी आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही’ असे नमूद केले आहे. तिच्या या आत्महत्येमुळे संपूर्ण लांघी कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत आहे. ती इतक्या टोकाची भूमिका घेईल, अशी अपेक्षा तिच्याजवळील व्यक्तींनीही बाळगली नव्हती. त्यामुळे नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली. या आत्महत्येसंदर्भात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Hrithik's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.