Jitendra Awhad: 'ओबीसींवर माझा विश्वास नाही, ते आरक्षणाच्या लढ्यात मैदानात नव्हते'; जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 11:42 PM2022-01-03T23:42:22+5:302022-01-03T23:42:59+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या एका वक्तव्यानं नव्या वादाला फुटण्याची शक्यता आहे.

OBC Reservation Jitendra Awhads controversial statement about OBC community | Jitendra Awhad: 'ओबीसींवर माझा विश्वास नाही, ते आरक्षणाच्या लढ्यात मैदानात नव्हते'; जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान

Jitendra Awhad: 'ओबीसींवर माझा विश्वास नाही, ते आरक्षणाच्या लढ्यात मैदानात नव्हते'; जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान

googlenewsNext

ठाणे-

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या एका वक्तव्यानं नव्या वादाला फुटण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात आरक्षणाबाबत बोलत असताना ओबीसी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला आहे. ओबीसींवर माझा विश्वासच नाही. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला फक्त महरा आणि दलित समाज होता, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. 

ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानं विरोधक आता आक्रमक झाले आहेत. 

"खरं तर ओबीसींवर माझा फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला फक्त महार आणि दलित समाज होता. कारण ओबीसींना लढायचं नव्हतं. ओबीसींवर ब्राह्मणवादाचा पगडा इतका आहे की आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहित नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येत देत नसतं. ते हे सर्व विसरले आणि आता आरक्षणासाठी पुढे येत आहेत. नुसतं घरात बसून व्हॉट्सअॅप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे. केंद्र सरकारशी दोन हात करावे लागणार आहेत", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

आव्हाडांच्या या वक्तव्यावर आता भाजपा नेते चंद्रशेखर बावळकुठे आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड नेहमीच आपल्या विधानांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करत असतात. महराष्ट्रात सगळ्या समाजात एकवाक्यता आहे. अशात ओबीसींना ज्या प्रकारे हिनवण्याचा प्रकार आव्हाड यांनी केला आहे तो अतिशय निंदनीय आहे. ओबीसी समाज त्यांना कधी माफ करणार नाही. यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे पाहावं लागेल. त्यांनी अजून डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही, असा इशाराच बावनकुळे यांनी आव्हाड यांना दिला आहे. तसंच आव्हाड यांनी केलेल्या विधानाबाबत ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणी देखील बावनकुळे यांनी केली आहे. 

Web Title: OBC Reservation Jitendra Awhads controversial statement about OBC community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.