ठाण्यात रूग्णालयातील १७ जणांच्या मृत्यूनंतर शरद पवारांचे ट्विट, म्हणाले- "हे अतिशय..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 01:59 PM2023-08-13T13:59:55+5:302023-08-13T14:01:01+5:30

Sharad Pawar on Thane | मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात घडला दुर्दैवी अन् संतापजनक प्रकार

Sharad Pawar reaction on Thane hospital tragedy where 17 patients died in single night eknath shinde | ठाण्यात रूग्णालयातील १७ जणांच्या मृत्यूनंतर शरद पवारांचे ट्विट, म्हणाले- "हे अतिशय..."

ठाण्यात रूग्णालयातील १७ जणांच्या मृत्यूनंतर शरद पवारांचे ट्विट, म्हणाले- "हे अतिशय..."

googlenewsNext

Sharad Pawar on Thane hospital tragedy 17 dead: ठाण्यात उपचाराअभावी महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांच्या मृत्यूनंतर, आता अधिकच धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर येत असतानाच, आता एकाच रात्रीत सुमारे १६-१७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरे डॉक्टर आणि कर्मचारी क्षमता तसेच रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे एकाच रात्रीत या अनेकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. यातील १३ रुग्ण हे ICU मधील, तर चार रुग्ण जनरल वॉर्ड मधील होते. दरम्यान, या रुग्णांना आजारपणाच्या शेवटच्या क्षणी आणले असल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले आहे.

"ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काल रात्रभरात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. गेल्या काही दिवसांपूर्वीच ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही हि अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली," अशा शब्दांत त्यांनी ट्विट केले.

एका रात्रीत १७ रूग्ण दगावल्याच्या वृत्ताला रुग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला आहे. काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने, तर काही रुग्ण ८० पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्याने डॉकटर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. १० ऑगस्टला  एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते. आता केवळ रात्री १०.३० पासून सकाळी ८.३० पर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री यांचा ठाणे जिल्हा, मुख्यमंत्री यांची ठाणे महानगरपालिका, ठाणे महापालिकेत २५ वर्षांपासून सेनेची सत्ता आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपर स्पेशलिटी कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन ठाण्यात केले होते, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे, मात्र हे करत असताना सर्वात जुने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दुर्लक्षित झाले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Sharad Pawar reaction on Thane hospital tragedy where 17 patients died in single night eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.