'आव्हाडांविरोधात आंदोलनं करायचो, तेव्हा मातोश्रीवरुन फोन यायचे अन्...'; नरेश म्हस्केंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 02:44 PM2024-01-04T14:44:32+5:302024-01-04T14:44:51+5:30

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे. 

Shinde group spokesperson Naresh Mhaske has criticized MLA Jitendra Awad | 'आव्हाडांविरोधात आंदोलनं करायचो, तेव्हा मातोश्रीवरुन फोन यायचे अन्...'; नरेश म्हस्केंचा दावा

'आव्हाडांविरोधात आंदोलनं करायचो, तेव्हा मातोश्रीवरुन फोन यायचे अन्...'; नरेश म्हस्केंचा दावा

प्रभू श्रीराम हे बहुजनांचे होते, तसेच ते मांसाहारी होते, असं विधान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानावरुन राज्यासह देशात वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाने देखील जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचदरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे. 

नरेश म्हस्केंनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात हिरवा साप आणि दुतोंडी साप म्हणतात. ते रात्रीचे ट्विट करतात सकाळी डिलीट करतात रात्री त्यांची अवस्था काय असते हे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना विचारा, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे. लोकांची माथी भडकवण्याचं काम जितेंद्र आव्हाड करत आहेत, असा आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. 

जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात जेव्हा आम्ही आंदोलन करायचो तेव्हा आम्हाला मातोश्रीवरून जितेंद्र आव्हाड यांना सांभाळून घ्या, असे फोन यायचे. जितेंद्र आव्हाड आपल्यातच येणार आहेत असं सांगितलं जायचे एवढा मातोश्रीचे जितेंद्र आव्हाड यांच्या विषयी प्रेम होते, असा दावा देखील नरेश म्हस्के यांनी केला आहे. खुर्चीसाठी मातोश्री ने हिंदुत्व सोडलेलं आहे. त्यांनी त्यांच्या जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलावं, भूमिका मांडावी, असं आव्हान देखील नरेश म्हस्के यांनी दिलं आहे. 

...तर मी खेद व्यक्त करतो- जितेंद्र आव्हाड

प्रभू राम जिथून गेले त्या गावचा माणूस मी आहे. त्यामुळे मला राम कुणी सांगू नये. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. मी पुरंदरेंच्या विरोधात बोललो तेव्हा मला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी माफी मागायला सांगितली होती. पक्ष कुणाची सामाजिक भूमिका ठरवू शकत नाही असं पवारांनी मला स्पष्ट सांगितले होते. मी एकटा लढतो. रोहित पवारांना मी फार महत्त्व देत नाही. अबुधाबीत जाऊन बोलणे सोपे आहे. कुठलेही भाष्य असते कार्यकर्त्यांनी पटतं ते घ्यावे आणि बाकी सोडून द्यावे. वाल्मिकी रामायणात जे लिहिलंय ते मी बोललो. लोकभावनेचा आदर करतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त विधानावर दिले आहे. 

Web Title: Shinde group spokesperson Naresh Mhaske has criticized MLA Jitendra Awad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.