धोकादायक इमारतींना स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:30 AM2021-06-02T04:30:06+5:302021-06-02T04:30:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : इमारतींचे स्लॅब पडून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतीला स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक केले ...

Stability certificate binding to dangerous buildings | धोकादायक इमारतींना स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक

धोकादायक इमारतींना स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : इमारतींचे स्लॅब पडून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतीला स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्याकडून हे प्रमाणपत्र घेऊन महापालिकेला सादर करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

उल्हासनगर महापालिका पावसाळ्यापूर्वी दरवर्षी धोकादायक इमारतींना नोटिसा देऊन नागरिकांना इमारती रिकामी करण्याचे आवाहन करते. तसेच इमारत पडून जीवित व वित्तहानी झाल्यास नागरिकांना जबाबदार धरले जाते. दरम्यान, गेल्या १५ दिवसांत मोहिनी व साईशक्ती इमारतीचा स्लॅब पडून १२ जणांचा बळी गेला आहे. अखेर आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आवाहन केले आहे की, धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्याकडून इमारतीची तपासणी करुन तसेच इमारतीची दुरुस्ती करत स्थैर्यता प्रमाणपत्र महापालिकेला सादर करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, ऐन कोरोना महामारीत कोणत्या मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्याकडून धोकादायक इमारतीची तपासणी करावी?. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. महापालिकेनेच एखाद्या मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्यांची नियुक्ती करुन धोकादायक इमारतीची तपासणी करावी. तसेच दुरुस्ती सुचवून स्थैर्यता प्रमाणपत्र महापालिकेला परस्पर सादर करण्याची मागणी होत आहे. धोकादायक इमारतीला वाढीव चटईक्षेत्र मंजूर करून त्यांची पुनर्बांधणी करावी. अशा मागणीने जोर धरला असून यातून हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महापालिका व राज्य सरकारने दुसरी घटना घडण्यापूर्वी ठोस निर्णय घेण्याची मागणीही होत आहे.

--------------------------------

सर्वेक्षणासाठी समिती स्थापन रेतीवर बंदी असताना शहरात १९९२ ते ९८ दरम्यान उलावा रेतीतून अनेक इमारतींचे बांधकाम झाले. त्याच दरम्यान बेकायदा इमारतींच्या तोडण्यात आलेल्या स्लॅबची दुरुस्ती करून घरांची विक्री झाली. अशाच इमारतीचे स्लॅब पडण्याच्या दुर्घटना होऊन अनेकांचे बळी जात आहेत. अखेर आयुक्तांनी अशा इमारतींचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रभाग समितीनुसार समिती स्थापन केली आहे.

Web Title: Stability certificate binding to dangerous buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.