बंद कंपनीत महिलेचा संशयास्पदरित्या मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:09+5:302021-07-12T04:25:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर- मुंबई-नाशिक महामार्गावरील कळमगाव हद्दीतील बंद असलेल्या कंपनीत एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

Suspicious death of a woman in a closed company | बंद कंपनीत महिलेचा संशयास्पदरित्या मृत्यू

बंद कंपनीत महिलेचा संशयास्पदरित्या मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

भातसानगर- मुंबई-नाशिक महामार्गावरील कळमगाव हद्दीतील बंद असलेल्या कंपनीत एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आशा अतुल तिवारी असे मृत महिलेचे नाव असून ती टिटवाळा येथे राहणारी आहे. या महिलेची हत्या झाली की आत्महत्या, याबाबत संभ्रम झाल्याने पोलीस चक्रावले असून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील कळमगाव हद्दीतील हॉटेल हिल टॉपच्या पुढे सिद्धेश्वर फूड्स ही कंपनी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद स्थितीत आहे. या कंपनीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आशा तिवारी (४०) ही टिटवाळा येथे राहणारी महिला कंपनीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने तिच्या डोक्याला झालेल्या गंभीर जखमांमुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज शहापूर पोलिसांनी वर्तवला आहे. साधारण दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून त्या महिलेचा पडून मृत्यू झाला की हत्या झाली, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिसांनी मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी दिली. याबाबत अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.

Web Title: Suspicious death of a woman in a closed company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.