त्या १४ गावांचा नवी मुंबईत समावेश करणार; एकनाथ शिंदे यांचे गावकऱ्यांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 05:22 PM2022-02-11T17:22:31+5:302022-02-11T17:22:43+5:30

नवी मुंबई महापालिका नको म्हणून काही वर्षापूर्वी अगदी हिंसाचाराचा मार्ग अवंलबिणा:या ठाणो, नवीमुंबईच्या वेशीवर वसलेल्या १४ गावांमधील ग्रामस्थांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होण्याचे वेध लागले आहेत.

Those 14 villages will be included in Navi Mumbai; Eknath Shinde's assurance to the villagers | त्या १४ गावांचा नवी मुंबईत समावेश करणार; एकनाथ शिंदे यांचे गावकऱ्यांना आश्वासन

त्या १४ गावांचा नवी मुंबईत समावेश करणार; एकनाथ शिंदे यांचे गावकऱ्यांना आश्वासन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे  : मागील दोन वेळेस नवी मुंबईतून बाहेर पडलेल्या त्या १४ गावातील रहिवाशांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश व्हावा अशी ईच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार भंडार्ली तसेच आसपासच्या १४ गावांचा नवीमुंबईत समावेश करण्याबाबत नगरविकास खात्यामार्फत सर्व तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शुक्रवारी नगरविकासमंत्री तथा ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

  भंडार्ली डम्पींगच्या मुद्यावरुन शुक्रवारी ठाणो महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात येथील गावकऱ्यांची बैठक लावण्यात आली होती. त्यावेळेस येथील रहिवाशांना नवी मुंबई महापालिकेत १४ गावांचा समावेश करावी अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. त्यानुसार शिंदे यांनी हे आश्वासन दिले आहे. येथील दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नावळी, भंडार्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिरस मोरी आदी गावांचा यात समावेश आहे.

नवी मुंबई महापालिका नको म्हणून काही वर्षापूर्वी अगदी हिंसाचाराचा मार्ग अवंलबिणा:या ठाणो, नवीमुंबईच्या वेशीवर वसलेल्या १४ गावांमधील ग्रामस्थांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होण्याचे वेध लागले आहेत. वास्तविक पाहता नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली त्यावेळेस या गावांचा समावेश करण्यात आला होता. परंतु आम्ही महापालिका नको म्हणून येथील रहिवाशांनी विरोध करुन बाहेर पडले होते. त्यानंतर पुन्हा या गावांचा समावेश नवी मुंबईत करण्यात आला होता. दोन वेळा समावेशानंतरही येथील रहिवाशांनी नाके मुरडली होती. आता मात्र नवी मुंबई महापालिकेत समावेशासाठी याच रहिवाशांनी आग्रही भुमिका घेतली आहे. राज्य सरकाराने आखलेल्या नवी मुंबई विमानतळ अधिसुचित क्षेत्रत (नैना) या गावांचा समावेश केल्याने पुन्हा एकदा येथील ग्रामस्थांचे पित्त खवळले होते. त्यानुसार आम्हाला महापालिकाच हवी अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.

शिळफाटा भागातून उजवीकडे वळल्यास कल्याण - तळोजा रस्त्यालगत ही गावे वसली आहेत. ठाणे महापालिका हद्दीत शीळ, डायघर अशा गावांना अगदीच खेटून ही गावे भौगोलिकदृष्टया नवी मुंबईशी संलग्न नसली तरी महापालिका स्थापनेच्या वेळेस त्यांचा महापालिकेत समावेश करण्यात आला होता. परंतु आता विकास कामे, समस्या सुटत नसल्याने या रहिवाशांनी पुन्हा महापालिकेत समावेशाची मागणी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीने हीच मागणी लावून धरली होती. त्यानंतर आता शुक्रवारी झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद देत या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे.

Web Title: Those 14 villages will be included in Navi Mumbai; Eknath Shinde's assurance to the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.