खडवलीजवळ भातसा नदीत दोघे बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 04:50 AM2018-12-24T04:50:47+5:302018-12-24T04:51:09+5:30

खडवली येथे भातसा नदीत मुंबईहून पिकनिकसाठी आलेले दोन जण बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली.

two sank in the river Bhatsa near Khadvala | खडवलीजवळ भातसा नदीत दोघे बुडाले

खडवलीजवळ भातसा नदीत दोघे बुडाले

Next

टिटवाळा (ठाणे) : खडवली येथे भातसा नदीत मुंबईहून पिकनिकसाठी आलेले दोन जण बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. रामलखन राजाराम मौर्या (२५, रा. घाटकोपर ) आणि अभिजित कृष्णा बागवे (३७, रा. मानखुर्द) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस आणि अग्निशमन दल त्यांचा नदीपात्रात शोध घेत असून २४ तास उलटूनही मृतदेह सापडले नसल्याची माहिती टिटवाळा पोलिसांनी दिली.
ठाणे येथील इंडिया सुपर सर्व्हिसेस या कंपनीतील १० कामगार खडवली येथील भातसा नदी परिसरात पिकनिकसाठी आले होते. सर्वजण नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले असता रामलखनला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हे पाहताच त्याला वाचवण्यासाठी अभिजित यांनी प्रयत्न केले. मात्र, घाबरलेल्या रामलखनने अभिजित यांच्या कमरेला मिठी मारल्याने दोघेही बुडाले. इतर मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरड केली; मात्र ते दिसेनासे झाले होते.
यानंतर, सर्वांनी टिटवाळा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खडवली पोलीस चौकीत जाऊ न घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात शोधाशोध केली. अखेर, काहीच हाती न लागल्याने शोध थांबवण्यात आला. रविवारी सकाळी कल्याण अग्निशमन दलाच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. मात्र, २४ तास उलटूनही मृतदेह सापडले नसल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आहिरराव यांनी दिली.

Web Title: two sank in the river Bhatsa near Khadvala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.