अंबरनाथमध्ये कार अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू

By पंकज पाटील | Published: October 18, 2023 05:59 PM2023-10-18T17:59:34+5:302023-10-18T18:00:55+5:30

याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

two youths die in a car accident in ambernath | अंबरनाथमध्ये कार अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू

अंबरनाथमध्ये कार अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू

पंकज पाटील, अंबरनाथ: मंगळवारी मध्यरात्री एका भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कारला भीषण अपघात घडला असून या अपघातात उल्हासनगरच्या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

कल्याण - बदलापूर राज्य महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान मानव थारवाणी आणि कौशल थारवाणी हे दोघे मित्र आपल्या खाजगी कारमधून अंबरनाथच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना त्यांचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे या गाडीने रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भयानक होती की संपूर्ण कार या धडके चेपली गेली. कारचा चालक मानव आणि त्याच्या शेजारी बसलेला कौशल या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस स्टेशनचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. या दोन्ही तरुणांचे मृतदेह कारमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर अनेक 'डेथ स्पॉट' अजूनही तसेच सोडून देण्यात आल्याने अनेक अपघात घडत आहेत. त्यातच मंगळवारी मध्यरात्री घडलेला अपघात हा दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याने कल्याण बदलापूर राज्य महामार्गाच्या सुरक्षा बाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Web Title: two youths die in a car accident in ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.