एमआयडीसीचा पाणीपुरवठा आज बंद

By admin | Published: June 30, 2017 02:50 AM2017-06-30T02:50:26+5:302017-06-30T02:50:26+5:30

बारवी धरणातून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. बारवी धरणातील पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या जांभूळ जलशुद्धीकरण

Water supply to MIDC is closed today | एमआयडीसीचा पाणीपुरवठा आज बंद

एमआयडीसीचा पाणीपुरवठा आज बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : बारवी धरणातून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. बारवी धरणातील पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रात्री १० नंतर पाणीपुरवठा सुरू होणार असला, तरी परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी शनिवारी दुपारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
शुक्रवारी ज्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, त्यात अंबरनाथ औद्योगिक वसाहत, संपूर्ण उल्हासनगर शहर, तळोजा एमआयडीसी, कल्याण ग्रामीण, कल्याण- डोंबिवली शहर, ठाणे, बेलापूर आणि मीरा-भार्इंदर यांचा समावेश आहे.

Web Title: Water supply to MIDC is closed today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.