आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणे . उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे . हा उपवासाचा खरा अर्थ आहे . उपवास करणे म्हणजे उपवाशी राहणे नव्हे. आपण काय करतो दिवसभर उपवास करतो .उपवासाच्या नावाने भात, भाकर , चपाती व भाज्या खात नाही थोडक्यात रोजचं जेवण घेत नाही ...