स्टार प्रवाह वाहिनीवरील ललित 205 मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. या मालिकेतून पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट उलगडणार आहे. राजाध्यक्ष कुटुंबाची प्रमुख आहे आजी. कुटुंबातील दुभंगलेली मने जोडण्यासाठी सुमित्रा राजाध्यक्ष कसे आणि काय काय प्रयत्न करतात याचे चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत विरळ होत चालली आहे. त्यातही आजीचा सहवास लाभणे दुर्मीळ होत आहे. या पार्श्वभूमीवर आधारीत ही मालिका आहे. 'ललित २०५'मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. Read More
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. 'ललित २०५'च्या हरवलेल्या पुस्तकाचा शोध सुरु असतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. ...