१९५३ साली झालेल्या नागपूर करारानुसार दरवर्षी महाराष्ट्र सरकारचे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येते. दरवर्षी हे अधिवेशन हिवाळा सुरु असताना घेण्यात येत असल्याने या अधिवेशनाला नागपूर हिवाळी अधिवेशन म्हणून संबोधले जाते. विदर्भाच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळाला पाहिजे यासाठी दरवर्षी विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात भरवले जाईल असं करारात नमूद करण्यात आलं आहे. भाजपा सरकारच्या काळात पहिल्यांदा हे अधिवेशन पावसाळ्यात नागपुरात भरविण्यात आले होते. Read More
सदस्य सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यातील जलजीवन मिशनची कामे निकृष्ट दर्जाची केल्यासंदर्भात लक्षवेधीद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. ...
आमच्या सरकारमध्ये नवाब मलिक बसणार नाहीत ही आमची स्पष्ट भूमिका आहे. नवाब मलिक यांना येण्यास मनाई केली असून ते आलेत. ते हिरोगिरी करत असतील तर ते जेलमध्ये जातील, असे शिरसाट म्हणाले. ...
गेल्या अनेक वर्षांपासूनच अशा प्रकारे साैंदर्याची भूरळ घालणाऱ्या या नगरीत आज ७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू झाले. मात्र, यंदा नागपूर नगरीच्या साैंदर्यीकरणाची चर्चा नव्हे तर तुलना चर्चेला आली आहे. ...
अधिवेशन नागपूरमध्ये होत असल्याने त्यात विदर्भातील प्रश्नांवर अधिक चर्चा स्वाभाविक आहे. तथापि, हे अधिवेशन केवळ विदर्भाचे नाही, महाराष्ट्राचे आहे. त्यातही ते विदर्भाचा विचार करणाऱ्या महाराष्ट्राचे असावे, असे अभिप्रेत आहे ...