जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
Lok Sabha Election 2024: पुलवामा येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या एअर स्ट्राईकवर विरोधी पक्षांसह काही नेते सातत्यानेश शंका घेत असतात. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असताना तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगाणा काँग्रेसचे प्रदे ...
Pulwama Attack: पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या ४० जवानांना वीरमरण आलं होतं. या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. ...
भारताविरोधात दहशतवाद पोसणाऱ्या, अब्जावधी पैसे खर्च करणाऱ्या पाकिस्तानला आता दहशतवादाने पोखरले आहे. विकासाऐवजी भारताविरोधात पैसे उधळल्याने पाकिस्तान आता कंगाल देश बनला आहे. ...