जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
१३ हजार ५०० हून अधिक पानांचे हे आरोपपत्र डीआजी सोनिया नारंग आणि एसपी राकेश बलवान यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या टीमने तपासानंतर सादर केले आहे. ...
पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यासाठी RDXचा वापर झाल्याचे तपासातून उघड झाल्यानंतर हे आरडीएक्स नेमकं आलं कुठून असा सवाल सातत्याने विचारण्यात येत होता. ...