दैव बलवत्तर! कारचा चक्काचूर होऊनही वाचले पाचही जण; कार-कंटेनरचा भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 07:29 AM2023-03-26T07:29:04+5:302023-03-26T07:29:14+5:30

महामार्गावर धानिवरी येथे कार-कंटेनरचा भीषण अपघात

All five survived the car wreck; Fatal Car-Container Accident | दैव बलवत्तर! कारचा चक्काचूर होऊनही वाचले पाचही जण; कार-कंटेनरचा भीषण अपघात

दैव बलवत्तर! कारचा चक्काचूर होऊनही वाचले पाचही जण; कार-कंटेनरचा भीषण अपघात

googlenewsNext

कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुपारी चारच्या सुमारास गुजरातहून मुंबईकडे जाणारी भरधाव कार कंटेनरवर जाऊन आदळली. कारचा अक्षरशः चक्काचूर झाला, मात्र सुदैवाने कारमधील पाचही जण बचावले. 

वापी येथील आपल्या कारखान्यातील काम आटोपून मुंबई येथील घरी जात असताना, धानिवरी गावच्या हद्दीत कारच्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार कंटेनरवर आदळली.  वाहनचालक उमेश मळेकर (वय २५) हा किरकोळ जखमी झाला ; तर जीत मैतालिया (२५) याच्या डोक्याला मार लागला आहे. तर विमल मैतालिया (५०), एस. जैन (३०), टप्पू मैतालिया (२०) हे किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्वांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, पुढील तपास कासा पोलिस करत आहेत.

Web Title: All five survived the car wreck; Fatal Car-Container Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात