मीरा भाईंदर महापालिकेने कंत्राटी ६६० सुरक्षा रक्षक काढून टाकल्याने अत्यावश्यक ठिकाणी सुरक्षा बलाचे जवान नेमणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 07:20 PM2023-10-04T19:20:58+5:302023-10-04T19:21:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी महापालिकेच्या विविध मालमत्ता ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या ...

Mira Bhayander Municipal Corporation will depute 660 contractual security guards to appoint security force personnel at essential locations | मीरा भाईंदर महापालिकेने कंत्राटी ६६० सुरक्षा रक्षक काढून टाकल्याने अत्यावश्यक ठिकाणी सुरक्षा बलाचे जवान नेमणार 

मीरा भाईंदर महापालिकेने कंत्राटी ६६० सुरक्षा रक्षक काढून टाकल्याने अत्यावश्यक ठिकाणी सुरक्षा बलाचे जवान नेमणार 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी महापालिकेच्या विविध मालमत्ता ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या ठेकेदाराची मुदत २०१८ सालीच संपुष्टात आलेली असल्याने ठेका रद्द केला आहे . त्यामुळे ६६० सुरक्षा रक्षक हे  सेवेतून कमी केल्याने त्यांच्या वेतनावर दर महिना १ कोटी ३५ लाख इतका खर्च वाचेल असा प्रशासनाचा दावा आहे . तर अत्यावश्यक ठिकाणी सुरक्षा रक्षकांची गरज नुसार अहवाल देण्यास विभाग प्रमुखांना आयुक्तांनी सांगितले असून तेथे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान नेमले जाणार आहेत . 

मीरा भाईंदर महापालिकेच्या शाळा , उद्याने , मैदाने , सभागृह , विविध कार्यालये , स्मशान भूमी , वाचनालय, पाण्याची टाकी, डम्पिंग आदी मालमत्तांच्या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक नेमले जात होते . सैनिक सिक्युरिटी ह्या ठेकेदारा मार्फत ६६० सुरक्षा रक्षक पालिकेच्या सेवेत नेमण्यात आले होते . काम करणाऱ्या ह्या सुरक्षा रक्षकां मध्ये काही तत्कालीन नगरसेवक व राजकारणी, काही अधिकारी आदींच्या वशिल्याने देखील अनेक जण काम करत होते . 

महापालिका आयुक्त काटकर यांनी सुरक्षा रक्षकांचा आढावा घेताना प्रशासकीय बैठकीत सैनिक सिक्युरिटीची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला व त्या नुसार १ ऑक्टोबर पासून ठेका रद्द केला गेला . सदर ठेकेदाराची मुदत २०१८ सलातच संपलेली होती. त्यावेळी महासभेने सुरक्षा रक्षक मंडळ , सानपाडा यांच्या कडून माहिती घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत सैनिक सिक्युरिटीला मुदतवाढ देण्याचा ठराव केला होता . 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार सैनिक सिक्युरिटी कडील कार्यरत सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्ह्या करीता नोंदणीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे . परंतु सुरक्षा रक्षक मंडळ कडून त्यावर सुद्धा कोणताच प्रतिसाद मिळाला नाही .  दुसरीकडे महापालिकेने महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५० जवान सुरक्षेसाठी घेतलेले आहेत . त्यातील अधिकारी वर्गाला दिलेले जवान काढून घेण्यात आले आहेत . त्यांना पालिकेच्या अत्यावश्यक असलेल्या मालमत्तांच्या ठिकाणी सुरक्षेसाठी नेमले जाणार आहे . 

दरम्यान ६६० खाजगी सुरक्षा रक्षक कमी झाल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची पाळी आली आहे . अचानक हातची नोकरी गेल्याने ते हवालदिल झाले आहेत . तर ठेकेदाराचे समर्थक आणि सुरक्षा रक्षकांना नेमण्यात वशिलेबाजी करणाऱ्यांची सुद्धा धावपळ सुरु झाल्याची चर्चा आहे . 

Web Title: Mira Bhayander Municipal Corporation will depute 660 contractual security guards to appoint security force personnel at essential locations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.