दहा दिवस उलटूनही पीक नुकसानीचे पंचनामे अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:41 AM2021-03-31T04:41:36+5:302021-03-31T04:41:36+5:30

राज्यातील बहुतांश भागांत १९ ते २१ मार्च आणि २२ ते २३ मार्चदरम्यानच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस ...

Even after ten days of reversal, the crop loss panchnama is incomplete | दहा दिवस उलटूनही पीक नुकसानीचे पंचनामे अपूर्णच

दहा दिवस उलटूनही पीक नुकसानीचे पंचनामे अपूर्णच

Next

राज्यातील बहुतांश भागांत १९ ते २१ मार्च आणि २२ ते २३ मार्चदरम्यानच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस पडला. लाखो हेक्टर क्षेत्रातील रबी पिकांसह भाजीपाला आणि फळपिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. त्यात वाशिम जिल्ह्यात २७ महसूल मंडळातील १६९ गावांतील गहू, हरभरा या रबी पिकांसह भाजीपाला पिके, तसेच टरबूज, खरबूज, पपई, संत्रा, लिंबू आदी फळपिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला असून, तसा प्राथमिक अहवालही शासनाकडे पाठविला आहे. तथापि, १० दिवस उलटले तरी तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर अंतिम अहवालच सादर करण्यात आला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष पंचनामे पूर्ण होऊन शासनाकडे अंतिम अहवाल सादर होणार केव्हा आणि शेतकऱ्यांना मदत मिळणार केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

-------------

नुकसानीचे ३० टक्के पंचनामे प्रलंबित

जिल्ह्यात ६८८० हेक्टर क्षेत्रातील रबी पिके, भाजीपाला पिके आणि फळपिकांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे; परंतु ३० मार्चपर्यंतही यापैकी केवळ ७० टक्के क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले असून, उर्वरित ३० टक्के क्षेत्रातील पंचनामेच झाले नसल्याने तालुकास्तरावरून अंतिम अहवालच प्राप्त होऊ शकला नाही.

--------------------

कोट : मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने २७ महसूल मंडळांतील १६९ गावांतील ६८८० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याचा प्राथमिक अहवाल शासनस्तरावर पाठविला आहे. काही भागातील पंचनामे अद्याप झाले नाहीत. आज तालुकास्तरावरून अहवाल मागवून शासनाकडे निधीची मागणी नोंदवू.

-शैलेश हिंगे,

निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

-------------

प्राथमिक अंदाजानुसार बाधित क्षेत्र

गावे - १६९

महसूल मंडळे - २७

बाधित क्षेत्र - ६८८० हेक्टर

--------------------

या पिकांना बसला फटका

भाजीपाला,

गहू,

टरबूज,

खरबूज,

काकडी,

Web Title: Even after ten days of reversal, the crop loss panchnama is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.