वाशिममध्ये साडे नऊ हजार शेतकºयांना रब्बी पिक विमा

By admin | Published: March 20, 2017 01:36 PM2017-03-20T13:36:01+5:302017-03-20T13:36:01+5:30

जिल्ह्यातील १० हजार ७३ पैकी ९ हजार ४९० शेतकरी भरपाईस पात्र ठरले असून, त्यांच्याकरिता एकूण ६ कोटी २३ लाख ९७ हजार ५४९ रूपये मंजूर

Rabbi Pick Insurance for Washingaw 9000 farmers | वाशिममध्ये साडे नऊ हजार शेतकºयांना रब्बी पिक विमा

वाशिममध्ये साडे नऊ हजार शेतकºयांना रब्बी पिक विमा

Next

वाशिम: गतवर्षी अर्थात २०१५-१६ मध्ये रब्बी हंगामात राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत, राज्यातील २६ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ८३ लाख रुपयांची नुकसान भरपाई बुधवार, १ मार्च रोजी मंजूर झाली आहे. ज्यामध्ये हरभरा, उन्हाळी भुईमूग व गहु या अधिसूचित पिकांकरिता जिल्ह्यातील १० हजार ७३ पैकी ९ हजार ४९० शेतकरी भरपाईस पात्र ठरले असून, त्यांच्याकरिता एकूण ६ कोटी २३ लाख ९७ हजार ५४९ रूपये मंजूर झाल्याची माहितीे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून शुक्रवारी प्राप्त झाली़
रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी (बागायत व जिरायत), करडई, सूर्यफूल, गहू (बागायत व जिरायत), कांदा, उन्हाळी भुईमूग व उन्हाळी भात ही आठ पिके अधिसूचित करण्यात आली होती. यापैकी हरभरा व गहु पिक घेणाऱ्या मालेगाव तालुक्यातील अनुक्रमे ७२६ व ३९९ या प्रमाणे १,१२२ शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग घेतला होता़ योजनेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी २९ लाख ५० हजार ४५५ रूपये, तर गहु पिकासाठी ४२ लाख ५९ हजार ९७५ रूपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ तसेच मंगरूळपीर तालुक्यातील एकूण १२०० शेतकऱ्यांनी हरभरा व ४५१ शेतकऱ्यांनी गहु पिकाचा विमा उतरविला होता़ या तालुक्यातील शेतकऱ्यांना हरभरा पिकासाठी १२ लाख ७२ हजार ६५४ रूपये, तर गहु पिकासाठी १ लाख ९२३ रूपयाची भरपाइ मंजूर झाली आहे़ मानोरा तालुक्यातील एकूण २४८ शेतकऱ्यांनी हरभरा तर ४६२ शेतकऱ्यांनी गहु पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते़ त्यांना हरभरा पिकापोटी ८ लाख ७२ हजार ७१६ रूपये, तर गहु पिकासाठी १० लाख ९५ हजार २४० रूपयाची नुकसान भरपाई मिळणार आहे़
रिसोड तालुक्यातील एकूण ३३८५ शेतकऱ्यांनी हरभरा व ६८८ शेतकऱ्यांनी गहू पिकासाठी विम्याचे सुरक्षा कवच घेतले होते़ त्यातील हरभरा पिकापोटी ३ कोटी ३६ लाख ४८ हजार ३५०, तर गहु पिकासाठी ३५ लाख ६९ हजार ४०३ रूपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ वाशीम तालुक्यातील एकूण ८३६ शेतकऱ्यांनी चना, तर ५५१ शेतकऱ्यांनी गहु पिकाकरिता राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग घेतला होता़ त्यांना चना पिकाबद्दल ५९ लाख ९९ हजार २६८ रूपये, तर गहु पिकासाठी ७८ लाख ८८ हजार रूपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे़ या शिवाय कारंजा तालुक्यातील एकूण ५४० शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात या योजनेतंर्गत गव्हाचा विमा उतरविला होता़ त्यांना ७ लाख २९ हजार ७३८ रूपयाचा विमा मंजूर झाला आहे़ दरम्यान, भारतीय कृषि विमा कंपनीकडुन एकत्रित नुकसान भरपाईची रक्कम संबंधीत बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. संबंधित बँकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली असल्याची माहिती मिळाली आहे़

Web Title: Rabbi Pick Insurance for Washingaw 9000 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.