शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

मन:शक्ती प्रबळ असली की मनुष्य ठरतो श्रेष्ठ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 8:26 AM

मनुष्याचा स्वभाव त्याच्या मनावरून ठरतो. परस्पर प्रेम आणि सद्भावना याचाही परिचय मनावरच अवलंबून असतो. महान तेजस्वी आणि सामर्थ्यवान कर्म करने, हीसुद्धा मनाचीच शक्ती असते. मोक्षप्राप्ती असो अथवा उन्नती असो या सर्वांना कारणीभूत मन असते.

मनुष्याचा स्वभाव त्याच्या मनावरून ठरतो. परस्पर प्रेम आणि सद्भावना याचाही परिचय मनावरच अवलंबून असतो. महान तेजस्वी आणि सामर्थ्यवान कर्म करने, हीसुद्धा मनाचीच शक्ती असते. मोक्षप्राप्ती असो अथवा उन्नती असो या सर्वांना कारणीभूत मन असते. आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना किंवा कृती याचा अनुमान मनावरच असतो. मन:शक्ती प्रबळ असली की मनुष्य श्रेष्ठ ठरतो. मनुष्याचे प्रयत्न त्या मन:शक्तीशी एकरूप व्हावे लागतात. तेव्हाच उत्तम गुणांनी, विद्वत्तेने एखादी चांगली कृती घडते. आपली बुद्धी सात्त्विक बनावयची असेल तर मनानी सत्कर्म केले पाहिजे. मन एकदा सात्त्विक बनले की विनाशकारी गोष्टींचे भय राहात नाही. सत्य मार्गावर चालून आत्मिक उन्नती साधली जाते. प्रकृती नियमानुसार मनुष्याची हानी, लाभ, शुभ-अशुभ दिव्य शक्ती, असुरी शक्ती, पाप भावना निंदायोग्य दुष्कर्म, परब्रह्माचे ज्ञान, भौतिक विज्ञान, आत्मिक तत्त्वज्ञान इत्यादी गोष्टींचे मूल्यमापन मनुष्याच्या मनावरून ठरते. कारण मन चांगले असले की सात्त्विक विचार निर्माण होतात.

सात्त्विक विचार मनुष्याच्या पुरुषार्थाला लक्ष्य बनवतात. मनुष्य स्वयं आपल्या मनानुसार वागतो. काही गोष्टी मनासारख्या होतात, तर काही मनाविरुद्ध घडतात. अशावेळी मनावर लगाम घातला पाहिजे. कारण ऋग्वेदात म्हटले आहे ‘मनुष्य ज्या गोष्टीत मन लावतो, ती गोष्ट, तो पुरुषार्थ प्राप्त करत असतो.’ म्हणून योग्य गोष्टीकडे मनाला लावा. मग मनातून विषय भोग, चिंता, दु:ख नष्ट होतील अन् विश्वासपूर्वक आनंद उपभोगाल! मनुष्य जीवनात अनेक अडचणी येतात. या सर्वांवर मात करून आपण आपला मार्ग अवलंबावा आणि विश्वासपूर्वक जीवन जगावे. व्यर्थ शोक न करता, उन्माद न करता शुद्ध स्वरूपात जीवन जगा म्हणजे आपल्या लक्ष्यावर मन केंद्रित करा. अन् सुख-शांतीचा मार्ग अवलंबावा.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक