शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आनंद तरंग- अक्षर ब्रह्मयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 03:12 IST

नोकरीला जाताना अडचणी आल्या, तरी त्यावर मात कशी करायची, हे मी कुलगुरू

स्नेहलता देशमुखअर्जुन भगवंतांना विचारतो, हे भगवंत ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे स्वभाव. कारण स्वभावो अध्यात्म उश्वते हा शब्द अधि+ आत्मन. अधि म्हणजे त्या संबंधीचे. म्हणून अधि आत्मन म्हणजे आत्म्यासंबंधीचे ज्ञान. स्वभाव म्हणजे स्वस्वरूपाविषयीचा भाव आणि स्वस्वरूपास जाणणे म्हणजे आत्म्याला जाणणे. म्हणूनच स्वभाव म्हणजे अध्यात्म. आनंदी स्वभाव, म्हणजे आनंदरूप आहे, हे जाणतो तो आनंद स्वरूपच होतो, परंतु असेही म्हटले जाते. ‘स्वभावो दुरतिक्रम’ स्वभाव बदलता येतो का? तर उत्तर आहे, नक्कीच बदलता येतो. आपण प्रयत्न करीत राहणे हाच त्यावर उपाय आहे.

नोकरीला जाताना अडचणी आल्या, तरी त्यावर मात कशी करायची, हे मी कुलगुरू असताना माझ्या टंकलेखिकेकडून शिकले. आमचे आॅफिस चर्चगेटला. टंकलेखिका राहायची डोंबिवलीला. नेहमीच कार्यालयीन वेळ साडेदहाची. एक दिवस बारा वाजून गेले, तरी तिचा पत्ता नव्हता. मी माझ्या सेक्रेटरीला फोन करून ती येणार आहे की नाही, हे विचारण्यास सांगितले, परंतु संपर्क होऊ शकला नाही. शेवटी दोन वाजता दुपारी तिचे कार्यालयात आगमन झाले. घाबरूनच तिने माझ्या आॅफिसमध्ये प्रवेश केला आणि उशीर झाल्याबद्दल क्षमा मागितली. मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवीत तिला म्हटले, ‘अगं, तू दमली असशील, तर आधी जेवून घे.’ तिचे उत्तर ऐकून मी अवाक् झाले. ती म्हणाली, ‘आम्ही सगळ्या मैत्रिणी गाडीतच भजन करीत प्रार्थना करीत होतो आणि उपास म्हणून फक्त दोन केळी खाल्ली. पुन्हा एकदा विठ्ठलाचे भजन केले. तासाभराने गाडीला सिग्नल मिळाला, आम्ही सगळ्यांनी देवाचे उपकार मानले आणि आॅफिसला आलो. आता तीन तास मी जास्त काम करून भरून काढीन. तुमची गैरसोय होऊ देणार नाही.’ खरंच, ही वृत्ती म्हणजेच आध्यात्मिक वृत्ती. श्रद्धा, संयम, सुविचार यांची सांगड घालून आपले जीवन समृद्ध करणे म्हणजे अध्यात्म जगणे. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक