शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

‘धर्म मार्गात राहून कर्माचरण करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:29 IST

चातुर्मास विशेष़...

सोलापूर : ‘धर्म मार्गात राहून कर्माचरण करणाºयांचे चित्त स्थिर होऊन मन:शांती मिळते व त्यायोगे सुख प्राप्त होते व शेवटी मोक्ष ही साधतो’ असे प्रतिपादन गौतम मुनीजी यांनी केले.

प. पू. श्री विनय मुनिजी म. सा. यांच्या नेतृत्वाखाली चातुर्मासानिमित्त आयोजित गुरु आनंद कमल कन्हैया धर्मसभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या चार पुरुषार्थात मुख्य पुरुषार्थ धर्मच होय. अधर्माचरणाने सुखप्राप्ती होत नाही तसेच अधर्माने मिळवलेला पैसाही टिकत नाही. अधर्माच्या मार्गाने केलेली कामे फलप्रद होत नाहीत. मानवी जीवनात धर्माचरणाने प्रतिष्ठा प्राप्त होते. 

मानवाची कर्मे त्याच्या मनाच्या शुद्धतेसाठी तसेच अशुद्धतेसाठी कारणीभूत असतात. सदाचाराने मनशुद्धी होते तर  दुष्कर्माने ते अपवित्र होते. व्रत, उपवास, जप, पूजा यामध्ये आनंदी वृत्ती होणे सुरुवातीस जरा कठीण वाटत असले तरी हळूहळू अभ्यासाने ती वृत्ती बळावून मन शक्तिसंपन्न होते. 

अशा सत्कर्माचरणासाठी अनुकूलता प्राप्त करून घेण्यास आळस आड येत नाही. प्रपंचात गुरफटून गेलेल्या मनुष्यास सत्कर्म करण्यास वेळच मिळत नाही हे म्हणणे चुकीचे आहे. सत्कर्माचरणाने विवेक प्राप्त होतो. विवेकाच्या योगाने ज्ञानप्राप्ती होते व ज्ञानाने मोक्षप्राप्ती होते. 

 मनात भक्ती असेल तर फळ मिळतेच हे सांगताना त्यांनी जितेंद्र बलदोटा यांचे उदाहरण दिले. सेवा क्षेत्रात ते सदैव तत्पर असतात. मुनींबरोबर रोज गोचरी म्हणजे भोजन आणण्यासाठी  बलदोटा हे तीन-चार किलोमीटर रोज सोबत चालतात अशा शब्दात त्यांनी बलदोटा यांचे कौतुक केले.  - गौतम मुनीजी, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकJain Templeजैन मंदीर