शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 03:39 IST

काला संस्कृत तत्त्वज्ञानामध्ये एक फार महत्त्वपूर्ण म्हण आहे की, ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। म्हणेजच शुभ गोष्टींचा साक्षात्कार अनेक प्रकारच्या विचारधारांनी होत असतो. हेच कारण आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म झालेला आहे.

- डॉ. भूषण कुमार उपाध्याय

काला संस्कृत तत्त्वज्ञानामध्ये एक फार महत्त्वपूर्ण म्हण आहे की, ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। म्हणेजच शुभ गोष्टींचा साक्षात्कार अनेक प्रकारच्या विचारधारांनी होत असतो. हेच कारण आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म झालेला आहे. अनेक प्रकारच्या विचारधारांच्या अस्तित्वामुळे भारतीय संस्कृती संपन्न आणि दृढ बनविलेली आहे. पुढील विधान हे याच गोष्टीचे सूचक आहे-‘एकं सद्म विप्रा बहुधा वदन्ति’।म्हणजे एकाच शुभ गोष्टीस विद्वान मनुष्य निरनिराळ्या प्रकाराने सादर करीत असतो. भारतीय कायदेपंडितांच्या म्हणण्यानुसार, मूळ ऊर्जा ही एकच आहे. परंतु जेव्हा ती व्यक्त होते, तेव्हा ती निरनिराळे रूप धारण करीत असते. तसेच ती एक असूनसुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात प्रदर्शित होत असते. एकच ऊर्जा व्यक्त होऊन अनेक नावे आणि रूपे धारण करीत असते. हेच कारण आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये एकाच तथ्य/खऱ्या गोष्टीला पाहण्याचे विविध दृष्टीकोन निर्माण झालेले आहेत. लोकशाहीचीसुद्धा हीच विशेषता आहे की, येथे अनेक प्रकारच्या विचारांचा आदर केला जातो. लोकशाही ही अशा प्रकारची बाग आहे ज्यामध्ये अनेक प्रकारची फुले उमलली आहेत. तसेच लोकशाहीच्या बागेमध्ये जितकी विविधता राहील ती तितकीच सुंदर दिसेल. भारतीय संस्कृतीमध्ये ईश्वरप्राप्तीकरितासुद्धा विविध मार्ग सांगितले गेलेले आहेत. ज्यामध्ये ज्ञान, भक्ती आणि कर्म हे मुख्य आहेत. प्राचीन काळात ज्ञान, भक्ती आणि कर्म यांना ईश्वरप्राप्तीचे वेगवेगळे मार्ग मानले जात होते. सदर मार्गांना माननारे स्वत:ला अन्य मार्गांच्या तुलनेत श्रेष्ठ असे मानत होते. तसेच या मार्गाला मानणाºया व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष आणि विरोध पाहायला मिळत होता. परंतु श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सुंदर प्रकारे या तीनही मार्गांचा समन्वय केलेला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कथनानंतर या मार्गांमध्ये जी पारंपरिक कटुता आणि वैमनस्य होते ते आता समाप्त झालेले असून एक प्रकारचे समन्वयक वातावरण निर्माण झालेले आहे. याच तºहेने भक्ती मार्गाचा अवलंब करणारे संत तुलसीदास यांनीसुद्धा ‘राम-चरित मानस’ ग्रंथामध्ये एक प्रकारे समन्वयक दृष्टीकोन स्वीकारलेला आहे. हा समन्वयवादी दृष्टीकोन समाज टिकण्याकरिता अतिआवश्यक आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक