शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

वास्तवात परत या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 5:19 AM

तुमची सर्वात प्रबळ आसक्ती ही तुमची धन-दौलत, तुमचे घर, तुमची मुलेबाळे किंवा तुमचा पती किंवा पत्नी यांच्याप्रति नाही.

तुमची सर्वात प्रबळ आसक्ती ही तुमची धन-दौलत, तुमचे घर, तुमची मुलेबाळे किंवा तुमचा पती किंवा पत्नी यांच्याप्रति नाही. तुमची सर्वात सखोल आसक्ती तुमचे विचार आणि तुमच्या भावनांशी आहे - नेहमीच. ‘नाही, मला माझी पत्नी प्रिय आहे, माझे मूल मला प्रिय आहे,’ असे तुम्ही म्हणाल. पण जेव्हा तुमची पत्नी, तुमचे मूल किंवा तुमच्या भोवतालची परिस्थिती यात तुमचे विचार, विचारसरणी आणि भावना विरुद्ध जातात, तेव्हा हे सर्व काही कोसळते. फक्त तुमचे स्वत:चे विचार आणि भावनाच तग धरून राहतात. खरे पाहता, आयुष्यात हेच तुम्ही जमवलेले आहे. तुमची विचार करण्याची पद्धत, तुमचे भावना व्यक्त करण्याचे मार्ग, तुमच्या कल्पना, तुमची विचारसरणी, तुमच्या धारणा आणि मान्यता... यात हे सारे तुमच्या भोवतालच्या इतर गोष्टींना चिकटून वाढत जाते. म्हणून हेच तुम्ही टाकून देणे गरजेचे आहे. तुमचे घर किंवा तुमचा बँक बॅलन्स नव्हे. तुमची विचार करण्याची पद्धत, भावना व्यक्त करण्याच्या रीती, तुमची विचारसरणी - तुमचे व्यक्तिमत्त्व, हेच तुम्ही खरोखर गोळा करून ठेवले आहे. हेच तुम्ही टाकून देणे गरजेचे आहे.‘माझ्याजवळ एक कल्पना आहे’ याचा अर्थ, हा काही बोध किंवा वास्तविकता नव्हे. ही केवळ विशिष्ट प्रकारची कल्पना आहे. विचारधारा म्हणजे एक संघटित कल्पना. ही कल्पनाच तुम्हाला वास्तविकतेपासून अलग करते. ही कल्पना जेव्हा मोठ्या प्रमाणावर संघटित केली जाते, तेव्हा ती तुम्हाला पूर्णत: वास्तविकतेपासून विभक्त करते. कल्पना फार आकर्षक आहे. जेव्हा ती मोठ्या प्रमाणात संघटित केली जाते, तेव्हा ती खूपच आकर्षक बनते. पण तुम्हाला वास्तविकतेपासून जर दूर केले गेले, तर खरोखर तुम्ही एक अर्थपूर्ण जीवन जगू शकाल का? खऱ्या अर्थाने तुम्ही वास्तविक जीवन जगू शकाल का? तुम्ही जीवन अनुभवू शकाल का? जीवन जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते जसे आहे तसे जाणून घेणे.-सद्गुरू जग्गी वासुदेव