शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

हरिपाठ

By admin | Published: September 10, 2016 12:33 PM

वारकरी संप्रदाय हा भक्तीसंप्रदाय आहे. संप्रदायाचे अधिष्ठान श्रीविठ्ठल आहे. हे त्या निर्गुण निराकार आद्य परब्रह्माचे सगुण साकार रुप आहे.

डॉ. बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा वारकरी संप्रदाय हा भक्तीसंप्रदाय आहे. संप्रदायाचे अधिष्ठान श्रीविठ्ठल आहे. हे त्या निर्गुण निराकार आद्य परब्रह्माचे सगुण साकार रुप आहे. वारकऱ्याने भक्तिसाठी नित्यनेमाने पंढरीची वारी निष्काम भावाने करावी आणि हरिनाम उच्चारणाने आत्मरुपाने सर्वत्र भरलेल्या त्या विठ्ठलाचे अनुसंधान साधावे आणि त्याच्याशी संलग्न राहावे. यासाठीच नित्य हरिपाठाचा पाठ करावा असा संकेत आहे. या हरिपाठाच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ हा ग्रंथ रचलेला आहे तो संसारी जीवासाठी तसेच मुमुक्षु साधकासही मार्गदर्शन करतो. हरिपाठ म्हणजे वाचेने नामाचे उच्चारण पुन:पुन: करणे अशा पाठामुळे मंत्राक्षराची अबध्दता नष्ट होते. जिभेला नामाची सवय व गोडी लागते आणि भगवंताचे नामरुप हृदयात ठसते तसे पाहता हरिपाठ वा वेदपाठच आहे. ‘‘हरि :ओम तत्सत्’’ या महामंत्राचे ‘‘हरि मुखे म्हणा हरि मुखं म्हणा’’ हे प्राकृत रुप होय. ज्ञानदेवांनी राम, कृष्ण, गोविंद, गोपाळ, विष्णू, नारायण ही कामे हरिनामाच्या बरोबरीने नामस्मरणासाठी सांगितली. भगवंताचे स्वरुप मानवी कक्षेच्या आवाक्याबाहेरचे आहे. फक्त भगवंताचे नामरुप व आत्मरुप सुलभ आहे. नाम उच्चाराबरोबर मानव सहजच ईश्वराशी जोडला जातो. संत म्हणतात ‘‘नाम उच्चारिता कंठी । पुढे उभा जगजेठी।।’’ खरेच अत्यंत एकाग्रस्तेने मनुष्य हरिनामाशी जोडला जातो, त्यावेळी तो विश्वाला विसरतो आणि त्याच्या सर्व उर्मी शांत होतात. हाच त्याच्या जीवनातील धन्य काळ ठरतो. सामान्य व्यवहारी दृष्टीने पाहिले तर जगता कुठल्याही वस्तूचे स्मरण त्याच्या नावापासूनच सुरु होते. वस्तूच्या गुणरुपाचे स्मरण त्याचया नावापासूनच सुुरु होते. वस्तूच्या गुणरुपाचे स्मरण करण्यासाठी ती वस्तू प्रथम पाहिलेली असावी लागते. म्हणजेच स्मरणासाठी नामच सुलभ आणि परिपूर्ण ठरते. म्हणूनच सर्व पंथ नामस्मरणाचा आग्रह धरुन आहेत. ‘‘एकतत्व नाम दृढ धरी मना । हरिसि करुणा येईल तुझी ।।’’