शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
3
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
4
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
5
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
6
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
7
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
8
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
9
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
10
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
11
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
12
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
13
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
14
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
15
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
16
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
17
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
18
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
19
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
20
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

बळीराजा आत्महत्या नको...तू फक्त विश्वास ठेव पिकेल धरणी माय !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 1:56 PM

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी मानवी देहाला आलो तर, सत्कर्म करीत जगा. इतर देहात फक्त आहार निद्रा, भय ,आणि मैथून ...

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी

मानवी देहाला आलो तर, सत्कर्म करीत जगा. इतर देहात फक्त आहार निद्रा, भय ,आणि मैथून एवढाच विचार आहे. परंतु मानवी देहात सत्कर्म करीत देहातून देवा पर्यंत जाता येते. असे. मानवाचा  दुर्लभ आहे. पाप पुण्याचे पारडे समसमान होते, त्यावेळी मनुष्य जन्म प्राप्त होतो.

प.पू. पारनेरकर महाराज म्हणाले -जगावे जगावे नेटाने जगावे.. मरावे मरावे हितालागी..!

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -आता तरी पुढे हाचि उपदेश.. नका करु नाश आयुष्याचा..! 

ही संतवचने माणसाला  जगण्याची प्रेरणा देतात. जगतांना सत्कर्म करण्याचा उपदेश करतात. आजश शेतकरीकर्जबाजारी होतो, एवढ्या क्षुल्लक कारणासाठी  सोन्यापेक्षाही मूल्यवान असणारा मनुष्य देह अविवेकानेनष्ट करतो. खरं तर, अध्यात्म  शास्त्रात असं सांगितलं आहे की -

आत्महत्येसारखं दुसरं पाप नाही. या पापातून मुक्त होता येत नाही. तो अतृप्त आत्मा त्याच देहात भरकटत राहतो. त्याला गती नाही. आपण मात्र अविचाराने हे पाप करत असतो. एक माणूस सोडून दिला तर, कुठलाही प्राणी कधीच आत्महत्या करीत नाही. वादळी वारे येते, कधी जल प्रलय होतो, अशा आपत्तीत कोणता प्राणी जीवन संपवतो..?                 

घरटे उडते वादळात.. वारुळात पाणी शिरते..!कोणती मुंगी, कोणते पाखरु सांगा आत्महत्या करते..? निर्धाराने जिंकू आपण.. पुन्हा यशाचा गड..!

कुणीही आत्महत्या करू नका. हा सोन्यापेक्षाही मूल्यवान असणारा मनुष्य देह अविवेकाने नष्ट करू नका. हा देह परत मिळणार नाही. आलेले दिवस निघून जातील, धरणी माता परत पिकेल, फुलेल पण गेलेला देह पुन्हा मिळेल का...? त्यामुळे विवेकाने जगा...!

समर्थ रामदास स्वामी म्हणतात -जीवनाचे सार विवेक विचार. दुजा आविष्कार नाही काही.!

संतांनी आम्हाला आनंदाने जगण्याचा मूलमंत्र शिकवला.     

निर्धाराच्या वाटेवर.. टाक निर्भीडपणे पाय..!तू फक्त विश्वास ठेव पिकेल धरणी माय!! 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत.) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक